कोल्हापूर / प्रतिनिधी
चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील घटनेमुळे कोल्हापूर विभागातून कर्नाटकच्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द केल्याचे वृत्त आहे.
सध्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरू आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील दहावी बारावीचे जे परीक्षार्थी सार्वजनिक वाहतुकीवर (एसटी बसेसवर) अवलंबून आहेत, त्यांनी व त्यांच्या पालकांनी ही बाब लक्षात घेऊन परीक्षेस जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. बोर्ड परीक्षेसाठी नियोजित पेपर दिवशी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे व परीक्षा द्यावी. असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत करण्यात येत आहे.
शिवाय तशी सूचना सीमावर्ती भागातील गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख यांनी सर्व शाळांमार्फत पालकांपर्यंत पोहोचवावी. कोल्हापूर व सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी याबाबतची सूचना अधिनस्त सर्व संबंधितांना देण्याबाबत कळवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment