Thursday, 3 July 2025

जुन्या पेन्शन करीता आर्त हाक आंदोलन- प्रा. विजय शिरोळकर


     सिल्लोड( प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (2005पुर्वी) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने  जुन्या पेन्शन योजने करिता  पावसाळी अधिवेशनात आंदोलनाची आर्त हाक संघटनेने दिली आहे.  शासनाविरोधात हिवाळी अधिवेशन , आयुक्त कार्यालय पुणे आणि बजेट अधिवेशन मुंबई  दरम्यान आंदोलने करण्यात आली होती.  सदर आंदोलनाची कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतलेली नाही.  या विरोधात आझाद मैदान येथे हजाराच्या संख्येने उपस्थित  निदर्शने करणार असल्याचे शासनास पाठवलेल्या पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे.  
    मयत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ जुन्या पेन्शनचा लाभ देण्यात यावा. मा. मुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे असताना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः म्हणजेच  2006 ला कमीत कमी 40 टक्के अनुदान प्राप्त अथवा घोषित  झाले असेल अशा सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 13 ऑगस्ट 2024 शासन परिपत्रकाप्रमाणे   मा. आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन देण्याकरता समिती गठीत केली होती त्याची विना तोडफोड अंमलबजावणी करण्यात यावी. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे 100 टक्के अनुदानित शाळेत 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदनित  तुकडीवरील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी.  सुप्रीम कोर्टामध्ये जुन्या पेन्शन योजना लागू करण्या करता शासनाने विना विलंब सकारात्मक शपथपत्र सादर करावे.  सेवा उपदानाचा लाभ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून देण्यात यावा. सर्वच खाजगी शाळेतील  2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ स्क्रुटिनी करुन सेवानिवृतांचे प्रस्ताव स्वीकारून मंजूर करावेत. विनाअनुदानित/अंशतःअनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायिक असतानाही  अन्याय झालेला आहे. सुरुवातीचे 8/10 वर्षे विनावेतन काम केले आहे. कित्येक शिक्षक बांधव लाभाविना मयत झाले आहेत, सेवानिवृत्त झाले आहेत, अत्यंत हालाकीमध्ये जीवन जगत आहेत. सदर कर्मचाऱ्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात यावा. या न्यायिक मागण्यांकरीता पावसाळी  अधिवेशनात आझाद मैदान मुंबई येथे जुनी पेन्शन पीडित कर्मचारी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.  विजय शिरोळकर  यांनी केले आहे

Friday, 27 June 2025

उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूरच्या सहाय्यक सचिव पदी नियुक्ती

हेरले / प्रतिनिधी

माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपशिक्षणाधिकारी  गजानन उकिर्डे  
यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूरच्या सहाय्यक सचिव पदी नियुक्ती झाली.
   उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांची सेवेची  सुरवात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे मध्ये  सहा. शिक्षक पदी होऊन जुनियर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापन १७ वर्षे केले . नंतर त्यांनी लोकसेवा आयोग परीक्षा देऊन ते महाराष्ट्र शासनामध्ये कडेगाव जिल्हा सांगली येथे गटशिक्षणाधिकारी पदी कामकाज केले. तदनंतर त्यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हातकणंगले या पदावर काम केले. पुढे त्यांनी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर या पदावर चांगले काम केले व नुकतीच त्यांची सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर येथे नियुक्ती होऊन हजर झाले. त्यांची या पदी नियुक्ती झालेबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी योजना डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सत्कार केला.

फोटो
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी योजना डॉ. एकनाथ आंबोकर  माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपशिक्षणाधिकारी  गजानन उकिर्डे यांचा
सत्कार करतांना.

Friday, 13 June 2025

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि संघटनांच्या वतीने निदर्शने

कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संसोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांच्यावर कारवाई 
होणेसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील सर्व कार्यरत संयुक्त संघटना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर  निदर्शने करून  लेखी निवेदन  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
      लेखी निवेदनातील आशय असा की,
दि. ०२ जून २०२५ ते दि. १२ जून, २०२५ पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण राज्यभर चालू होते. या प्रशिक्षणामधील कडक शिस्तीमुळे व हुकुमशाही वृत्तीमुळे अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना या प्रशिक्षणास मुकावे लागले आहे. कारण प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरी सक्तीची केली होती व ती सही अपलोड झाली नसेल तर संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणातून लीव्ह (Leave) करण्याचे आदेश SCERT चे संचालक  राहूल रेखावर यांनी दिलेले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर अतिनिर्बंध  लादले गेले. या विहित वेळेत पोहोचण्याच्या भितीपोटी चिपळून ते रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मिनी बसचा अपघात होऊन ३० शिक्षक जखमी झाले व त्यातील काही गंभीर जखमी शिक्षक मृत्यूशी झुंज देत आहेत.
    यास केवळ SCERT चे संचालक  राहूल रेखावार यांचा हेकेकोरपणा कारणीभूत आहे. या अपघातानंतर सध्या  राहुल रेखावर यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काहीही संबंध नाही असे धक्कादायक विधान देवून आपली असंवेधनशीलता सिद्ध केलेली आहे. त्याच्या या हिटलरी वृत्तीमूळे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण आनंददायी होण्या ऐवजी त्रासदायक झाले.
  अनेक संघटनांनी मागणी करूनही किरकोळ ५/१० मिनीट लेट आलेल्या शिक्षकांच्या अनुउपस्थितिचा कालावधी क्षमापित केलेला नाही. तर त्यांना या प्रशिक्षणातून Leave करून परत घालविले आहे. तसेच वेळेत लिंक ओपन न झाल्याने व सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन मूल्यमापनाचा फज्जा या प्रशिक्षणामध्ये उडालेला आहे. या सर्वास संचालक राहूल रेखावार यांचे असहिष्णूता कारणीभूत आहे. म्हणून आम्ही या निवेदनाव्दारे मागणी करतो की, किरकोळ अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करून शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करू द्यावे व SCERT चे संचालक  राहूल रेखावार यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून SCERT चा कारभार काढून घ्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाव्दारे आम्ही करत आहोत. अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,
सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे , सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, मिलींद बारवडे ,उमेश देसाई ,राजेंद्र कोरे, आर डी पाटील, प्रा. सी एम गायकवाड,'राजाराम वरुटे, राजेश वरक, विलास पिंगळे ,दिलीप माने,शिवाजी भोसले , महादेव डावरे , सविता गिरी, सुभाष जाधव, बाबा पाटील, मनोहर जाधव, संजय पाटील, सुरेश संकपाळ, आदिसह अन्य मान्यवर.

फोटो
कोल्हापूर : जिल्हा अधिकारी कार्यालया समोर निदर्शने करतांना अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे , सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे उमेश देसाई सह अन्य पदाधिकारी

हेरलेतील १६ वर्षाखालील राष्ट्रीय कब्बड्डी खेळाडू कु. समर्थ ठोंबरे याची १८ वर्षाखाली जिल्हा कब्बड्डी संघात निवड न करून त्याच्यावर केला अन्याय

हेरले / प्रतिनिधी

   हेरले (ता. हातकणंगले) येथील कु. समर्थ कुमार ठोंबरे ( वय १६ )याची मार्चमध्ये संपन्न झालेल्या १६ वर्षाखालील बिहार येथील ३४ वी राष्ट्रीय किशोर गट अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेत निवड होऊन उत्कृष्ट कामगिरी करीत राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला मात्र त्याची १८ वर्षाखालील होणाऱ्या कब्बड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनने निवड केली नाही. १६ वर्षाखाली एका राष्ट्रीय खेळाडूची जिल्हा संघात निवड केली जात नाही. हा अन्याय या खेळाडूवर झाला आहे. असा अन्याय पुन्हा कोणा कब्बड्डी खेळाडूवर होऊ नये म्हणून १६ वर्षाखालील कु. समर्थ ठोंबरे याची राष्ट्रीय खेळाडू म्हणून  कशी निवड झाली याची सविस्तर माहिती  जय शिवराय कब्बड्डी क्रीडा संघ हेरलेचे प्रशिक्षक शिवराज निंबाळकर, राहूल कराळे, सुशांत ढेरे, विपुल गवळी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे देत आहोत.
     समर्थ हा इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असले पासून वयाच्या दहाव्या वर्षापासून जयशिवराय कब्बडी  संघात खेळतो आहे. गेली पाच वर्षे तो खुपच चांगला सराव करीत असल्याने  त्याचा खेळ खुपच उत्कृष्ट झाला. या त्याच्या उत्कृष्ट खेळाचे यश म्हणजे १५ ते १६ फेब्रुवारी २०२५ मध्ये इचलकरंजी येथे बालभारत मंडळाने किशोर गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत  त्याने खेळ उत्कृष्ट केल्याने त्याची जिल्हा संघात निवड झाली. त्याच्या या यशामुळे  २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक येथे किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत खेळण्याची संधी मिळून राज्य खेळाडू म्हणून उदयास आला. या स्पर्धेत ही उत्कृष्ट खेळ केल्याने त्याची
 कोल्हापूर जिल्हयातून एकमेव निवड  राष्ट्रीय खेळाडू म्हणून बिहार येथील २७ ते ३० मार्च २०२५ मधील ३४ राष्ट्रीय किशोर गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी  झाली. या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान आपल्या कब्बड्डी खेळाच्या जोरावर मिळविला.
  कु. समर्थ हा १६ वर्षाखालील वयोगटात राष्ट्रीय खेळाडू होत असतांना त्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर  उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत शिखर गाठले असता त्याची कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनने  १८ वर्षाखाली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड का केली  नाही, हा प्रकार काय? याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. 
   मुले कब्बड्डी खेळाचा सराव करीत असतांना खुप कष्ट घेतात त्यांची स्वप्ने जिल्हा खेळाडू, राज्य खेळाडू ,राष्ट्रीय खेळाडू होण्याची असतात. त्यांना या यशामुळे शासकिय किंवा खाजगी नोकरीत संधी मिळू शकते. त्यांना या खेळाच्या यशातून जिवनात नोकरीच्या माध्यमातून  आर्थिक स्थर्ये प्राप्त होऊ शकते. मात्र उत्कृष्ट खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करूनही त्यांची  जिल्हा संघातच निवड होऊ शकत नसेल तर त्यांची स्वप्ने अधुरीच राहणार.
   १६ वर्षाखालील राष्ट्रीय खेळाडू  कु. समर्थ कुमार ठोंबरेची १८ वर्षाखालील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड न करता त्याच्यावर झालेला जो अन्याय आहे. तो अक्षम्य आहे. अशा प्रकारे कोणत्याही कब्बड्डी खेळाडूवर असा अन्याय होऊ नये यासाठी ही माहिती
जय शिवराय कब्बड्डी क्रीडा संघ हेरलेचे प्रशिक्षक शिवराज निंबाळकर, राहूल कराळे, सुशांत ढेरे, विपुल गवळी आदी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे देत आहोत.

Thursday, 12 June 2025

वयोवृद्ध शेतकऱ्याला कर्तव्यदक्ष पोलीसांचा मदतीचा हात. कर्तव्यतत्पर पोलिसांचा वाहतूक शाखेतर्फे सत्कार


हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील पोलीस हावलदार बाबासाहेब कोळेकर यांनी वयस्कर व्यक्तीला मदत करून त्याची ६८ हजारांची रक्कम नातेवाईकाकडे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुपूर्द केल्याबद्दल पोलीस अंमलदार बाबासाहेब कोळेकर पोलिस अंमलदार जितेंद्र भोसले, सुरेंद्र खाडे  यांचा सन्मान शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सत्कार केला.
   संपत महादू ढगे (वय ७५, रा. नारोली सुपा जि. पुणे) हे तावडे हॉटेल कमानीजवळ रस्त्याकडेला पडलेले मिळून आले. पोलिस हावालदार बाबासाहेब कोळेकर यांना माहिती मिळताच त्याला मदत करण्यासाठी सहकारी जितेंद्र भोसले व सुरेंद्र खाडे यांना बोलावून घेतले. यावेळी वयस्कर व्यक्ती दारू प्यायल्याचे समजले. त्याच्या हातात पैशांचे बंडल होते. पोलिसांनी त्याचा पत्ता, संपर्क क्रमांक विचारून घेतला. संबंधित व्यक्तीच्या मुलाशी संपर्क झाल्यानंतर  संपत ढगे यांच्याजवळ ६८ हजारांची रोख रक्कम असल्याचे समजले.मुलाशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी दोन नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी ही रक्कम नातेवाईकांच्या ताब्यात देऊन वयस्कर व्यक्तीला पुणे येथे जाण्यासाठी मदत केली. याबद्दल वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी तीन वाहतूक पोलिसांचा विशेष सन्मान केला.

फोटो 
पोलीस अंमलदार बाबासाहेब कोळेकर, जितेंद्र भोसले, सुरेंद्र खाडे  यांचा सन्मान शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे करतांना.

Wednesday, 11 June 2025

जून-जुलै २०२५ च्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी हॉल तिकीट लवकरच

कोल्हापूर / प्रतिनिधी
   जून-जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन  प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार दिनांक १२/०६/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील.
अशी माहिती प्रसिद्धीस पत्रकाद्वारे राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ यांनी दिली.
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा जून जुलै २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना जून-जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार दिनांक १२/०६/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. 
या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
      चौकट
पुरवणी परीक्षेसाठी शाळामार्फत परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. 24 जून पासून सुरू होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळात इयत्ता दहावी साठी 2377 आणि बारावी साठी 4822 असे एकूण 7199 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. 
   तर कोकण विभागीय मंडळा अंतर्गत इयत्ता दहावीसाठी 192 आणि बारावी साठी 397 असे 589 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अतिविलंब शुल्कासह पुनर्परीक्षार्थींना अर्ज भरता येणार आहे.
-राजेश क्षीरसागर,
 विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ.

Monday, 9 June 2025

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व शैक्षणिक समस्या सोडविणे यास प्राधान्य नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत


कोल्हापूर / प्रतिनिधी

   माझ्याकडे प्रशासकिय अनुभव पुष्कळ असल्याने या जिल्हयातील शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा अधिकाधिक विकास करणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या कामात सर्व शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांनी सहकार्य करावे, असे उदगार जिल्ह्याच्या नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांनी काढले.
       कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने  अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांचा सत्कार करून स्वागत केले. या प्रसंगी एस. डी. लाड यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्वलंत समस्या स्पष्ट करून त्या सोडविण्यास प्रयत्नशील राहूया अशी विनंती केली.
  तसेच नूतन उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले यांचाही सत्कार एस. डी. लाड यांच्याहस्ते करण्यात आला.या प्रसगी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, अधिक्षक प्रविण फाटक, विस्तार अधिकरी डी. ए. पाटील आदी उपस्थित होते.

    या शिष्टमंडळात प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे,आर. डी. पाटील, राजेश वरक, मिलींद बारवडे, मनोहर जाधव, आर. बी. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    फोटो कॅप्शन
 शैक्षणिक व्यासपीठ  अध्यक्ष एस. डी. लाड नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांचा सत्कार करतांना शेजारी सुधाकर निर्मळे, प्रा. सी. एम.गायकवाड आर. डी. पाटील, राजेश वरक व अन्य मान्यवर

Saturday, 31 May 2025

सुजाता कचरे व वहीदा खतीब अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित




हेरले /प्रतिनिधी
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेरले (ता. हातकणंगले) येथील सुजाता कचरे व वहीदा खतीब या दोन महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आसल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी दिली .
        महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने व ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता महिला बचतगट, आरोग्य , साक्षरता ,आरोग्य स्वयंमसेविका(आशा) यासारख्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना सरपंच राहुल शेटे व उपसरपंच निलोफर खतीब, सदस्य उर्मिला कुरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह , देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 
       यावेळी सरपंच राहुल शेटे ,उपसरपंच निलोफर खतीब ,ग्रामपंचायत अधिकारी बी एस.कांबळे,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले,मनोज पाटील,अमित पाटील, मानसिंग माने,उर्मिला कुरणे, जयश्री कुरणे आदी उपस्थित होते.

Thursday, 29 May 2025

गणितायन’च्या प्रयोगशीलतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दाद


शिक्षक डॉ. दीपक शेटे यांच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा

हेरले /प्रतिनिधी
“शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नव्हे, तर अनुभवातून प्रेरणा देणं,” हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूरातील एका शिक्षकाने अनोखा शिक्षण प्रयोग उभारला असून, त्याची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. ‘गणितायन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत अजित पवार यांनी डॉ. दीपक शेटे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. शेटे यांनी हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे स्वतःच्या घरी एक आगळी वेगळी गणित प्रयोगशाळा विकसित केली आहे. मागील १५ वर्षांत सुमारे ५० लाख रुपयांची स्वखर्चाने गुंतवणूक करत त्यांनी ‘गणितायन’ हे अनुभवाधिष्ठित गणित शिक्षण केंद्र उभारले आहे. यामध्ये मापन साहित्य, जुनी नाणी, मोजमाप उपकरणे, दुर्मीळ पोस्ट तिकीटे, नोटा, भिंतीवर लावले जाणारे पट्टे, प्राचीन घड्याळे आदी १०,००० हून अधिक वस्तूंचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना गणिताचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि संकल्पना समजावून सांगणाऱ्या या केंद्राची माहिती मिळताच उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. 
"शिक्षणात नावीन्य, समर्पण आणि प्रयोगशीलतेचा संगम म्हणजे शेटे सरांचा उपक्रम. महाराष्ट्रात असे शिक्षक आहेत हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे," असे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच, शिक्षण विभागाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी त्यांनी निर्देश दिले असून ‘गणितायन’ची राज्यस्तरावर नोंद घेण्याचेही सूचित केले आहे.
हे शिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना खुले असून आजवर हजारो विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, आमदार व कुलगुरूंनी येथे भेट दिली आहे. प्रयोगशील शिक्षणाचा हा प्रयोग केवळ स्थानिक नव्हे, तर राज्याच्या शैक्षणिक चळवळीचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे.

Tuesday, 27 May 2025

संदीप पुजारी यांची जिल्हा कोतवाल कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

पुलाची शिरोली/ वार्ताहर
 येथील गाव कामगार तलाठी कार्यालयातील कोतवाल संदीप धोंडीराम पुजारी यांची कोल्हापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदी निवड झाली आहे.
 संदीप पुजारी गेली अनेक वर्षापासून कोतवाल म्हणून काम पाहत आहेत. शासनाच्या विविध योजना, महसुली विभागाचे कामकाज, महामार्ग आंदोलन, पूर परिस्थिती,कोरोना संकट, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक सामाजिक व शासकीय कामांमध्ये पुजारी यांचे उल्लेखनीय काम आहे. या त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जिल्ह्याच्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
या निवडीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Monday, 19 May 2025

या शैक्षणिक वर्षापासून मुलांना इयत्ता अकरावी प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच मिळणार‘ - मुलांनी ऑफलाईन प्रवेश घेऊ नये.


कोल्हापूर /प्रतिनिधी
                 दिनांक 6 मे 2025 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून राज्यातील सर्व क्षेत्राकरिता अल्पसंख्यांक दर्जासह उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालय याच्या मध्ये  सर्व शाखा मधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्यात येणार आहे.         
       विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित करताना पालकांनी शासन निर्णय प्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक राहील तसेच प्रवेश निश्चित केले नंतर विषयांमध्ये बदल केल्यास सदर विषयासाठी शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क अदा करावे लागेल.              
     शासनमान्य प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयास करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रत्येक प्रवेश फेरीदरम्यान शासन मान्यता प्रवेश क्षमतेनुसार शिल्लक प्रवेश क्षमता तपासून घ्यावी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
        ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही.
     *CBSE व ICSE या बोर्डाच्या उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये ऑन लाईन प्रवेश होणार नसून फक्त राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश केले जाणार आहेत*
    सर्व पालकांना विनंती करण्यात येते की, ऑफलाईन प्रवेश निश्चित करू नका.  ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश होणार असल्याने ऑनलाईन प्रवेशासाठी कागदपत्रे तयार ठेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन माहिती भरावी व इयत्ता ११ वी प्रवेश घ्यावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

Saturday, 17 May 2025

राजेंद्र विद्यामंदिरचा शंभर टक्के निकाल


    हेरले / प्रतिनिधी
राजेंद्र एज्युकेशन ट्रस्टचे राजेंद्र विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल हालोंडीच्या दहावीचा निकाल सलग २३ वर्षे शंभर टक्के लागला आहे.
      गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी 
प्रथम अनुष्का सुनील पाटील ९५.६० टक्के व अभिनव अभिजित पाटील ९५.६० टक्के, द्वितीय वैष्णवी अशोक पाटील ९३ टक्के , तृतीय समीक्षा राजगोंडा पाटील ९१.४० टक्के, चतुर्थ सानिका अजय पाटील ९१ टक्के, तर पाचवा भक्ती दीपक ऐतवडे ८९.६० टक्के गुण मिळवून शाळेत क्रमवारीत अव्वल आले. ५ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त, २१ विद्यार्थी ८० टक्के, तर १२ विद्यार्थी ७० टक्के व १२ विद्यार्थी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन यशाचे शिखर गाठले.

Thursday, 15 May 2025

वडगाव विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश

पेठवडगाव /प्रतिनिधी
  शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित,
 वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावने
दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. विद्यालयाचा एकूण  निकाल  ९७.८० टक्के लागला.सेमी १०० टक्के,सेमी संस्कृत १०० टक्के व टेक्निकलचा १०० टक्के लागला आहे. 
 गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी -                                           प्रथम क्रंमाक- कु. कोळी समीक्षा दीपक        (96.20% ),द्वितीय क्रमांक कु. पाटील अदिती विकास
( 94.60% ),तृतीय क्रमांक  कु. पाटील अनुजा संजय   
 ( 91.60% ),  टेक्निकल शाखा प्रथम क्रमांक
 कु. सुनिता रामू गुंडरे (75% ), मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु.वरद सचिन डोईफोडे   (90.20% )आदीनी यश संपादन केले.
90% पेक्षा जास्त 9 विद्यार्थी,80 ते 90 % दरम्यान 26 विद्यार्थी ,70 ते 80% दरम्यान 45 विद्यार्थी यांनी यश मिळविले आहे.
   या यशवस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई , चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे- देसाई , प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य  बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य ए. ए.पन्हाळकर वरिष्ठ लिपिक  के. बी. वाघमोडे  यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका सौ. आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक एस. एच. निर्मळे , पर्यवेक्षिका यु.सी. पाखरे, टेक्निकल विभाग प्रमुख ए. एस.आंबी व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

Tuesday, 13 May 2025

कोकण व कोल्हापूर दहावी परीक्षेतही अव्वल


कोल्हापूर /प्रतिनिधी

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) मध्ये कोकण विभागाने, विभागीय मंडळ स्थापनेपासून म्हणजे सन २०१२ पासून प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. चालू वर्षी कोकण विभागीय मंडळाचा निकाल 98.82% इतका आहे. मागील वर्षी 99.01% निकाल होता. निकालात 0.19 इतकी किंचितशी घट झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32% निकालासह राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाने 96.87% निकालासह राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता (सन 2021 चा अपवाद वगळता) कोल्हापूर विभाग द्वितीय क्रमांकावर आहे. मागील वर्षी कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 97.45% इतका होता. निकालात 0.58% इतकी किंचितशी घट झाली आहे.

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. बारावी प्रमाणे दहावी मध्ये दोन्ही मंडळांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
राज्यात निकालात व कॉपीमुक्त अभियानात कोकण व कोल्हापूर विभाग अव्वल आहे. कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान जोरकसपणे राबविण्यात आले. कोल्हापूर विभागात तर डिसेंबर 2024 पासूनच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

"राज्यस्तरावरून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा, विभागीय मंडळ स्तरावरील सर्वांचे परिश्रम, जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांचे सहकार्य, शाळा, महाविद्यालयाकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद यामुळे कोकण व कोल्हापूर मंडळ अव्वल स्थानी आहे.
-राजेश क्षीरसागर,
 विभागीय अध्यक्ष, 
कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.

Monday, 12 May 2025

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी

कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अशी माहिती प्रसिध्दीस पत्रकाद्वारे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

  मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. https://results.digilocker.gov.in

२. https://sscresult.mahahsscboard.in

3. http://sscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

4. https://results.navneet.com

6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-

exams

७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-

results

2. https://www.indiatoday.in/education-today/results

. https://www.aajtak.in/education/board-exam-results

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत्त (प्रिंट आउट) घेता येईल,

तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना

एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

११ ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक १४/०५/२०२५ ते बुधवार, दिनांक २८/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा,

३) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

Friday, 9 May 2025

सन २०२४-२०२५ च्या सेवक संचानुसार रिक्त-अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया थांबवावी.जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी


कोल्हापूर / प्रतिनिधी

सन २०२४ -२५ सेवक संच्यानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समोयजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,  चेअरमन राहुल पवार ,सचिव आर. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे लेखी निवेदन अधिक्षक उदय सरनाईक यांनी स्विकारले
   लेखी निवेदनातील आशय असा की,शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा सेवक संच दि. १५ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार झालेला आहे. सेवक संच सध्या शाळांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर सेवक संचामध्ये प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५% शाळांमध्ये शिक्षकांची शून्य (०) पदे मंजूर झालेली आहेत. तर कांही शाळांमध्ये इ. ९ वी १० वी च्या गटात शून्य (०) पदे आलेली आहेत. कांही शाळांची सेवक संच चुकीचे आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची माहीती घेतली असता दि. १५ मार्च, २०२४ च्या या शासन निर्णयाचा खूप मोठा फटका मराठी शाळांना बसलेला आहे.
  सदर शिक्षकांचे लगेचच समायोजन करण्यासाठी आपण संदर्भाकिंत पत्रानुसार माहिती मागविलेली आहे. या मराठी शाळा शिक्षकांअभावी बंद पडल्यातर डोंगरी भागातील, ग्रामीण भागातील शेतक-यांच्या कष्टक-यांचे मुलांचे शिक्षणच बंद होणार आहे. दि. १५ मार्च, २०२४ च्या या शासन निर्णयातील सेवक संचाच्या विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी नाम. शिक्षणमंत्री महोदय, मा. शिक्षण आयुक्त, मा. शिक्षण संचालक यांच्या बरोबर बैठक घेऊन विद्यार्थी संख्येचे निकष बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कांही जिल्ह्यातील संस्थाचालक व मुख्याध्यापक संघटना यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे व सदर शासन निर्णयानुसार सेवक संच प्रक्रीयेला स्थिगीती मिळवलेली आहे असे समजते.
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सदर समायोजन प्रक्रीयेला कांही कालावधीसाठी स्थिगीती द्यावी व शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करणे संदर्भात महामंडळाच्या पदाधिकारी यांच्या बरोबर सहविचार सभा घ्यावी असे पत्र मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे. तेव्हा आपणही पुढील आदेशा होईपर्यंत रिक्त-अतिरिक्त पदांची मागविलेली माहिती कांही कालावधीकरिता स्थगित करावी ही विनंती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर करीत आहे.
 या शिष्टमंडळामध्ये बी. जी. बोराडे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी ,पंडीत पवार ,शिवाजी कुरणे, संदीप पाथरे, संभाजी पुजारी, पोपट पाटील आदी उपस्थित होते.

फोटो 
लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना देताना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,  चेअरमन राहुल पवार ,सचिव आर वाय पाटील  शेजारी अन्य मान्यवर

Wednesday, 7 May 2025

संच मान्यता प्रक्रिया स्थगित करावी यासाठी शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शुक्रवारी निवेदन



कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यते बाबत पारीत केलेला शासन आदेश अन्याय कारक असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पडतील. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सदरच्या आदेशास नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सदरच्या स्थगिती नुसार कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेली संच मान्यता त्वरीत स्थगित ठेवावी यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त शिष्ट मंडळ शुक्रवार दि. ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना सकाळी ११ वा. लेखी निवेदन देण्याचा निर्णय आज विद्याभवन येथे घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार होते. व्यासपीठ  अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली.
      या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, बी. जी. बोराडे, सचिव आर. वाय. पाटील, अनिल लवेकर, भरत रसाळे,प्रा.सी एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, राजेश वरक ,इरफान अन्सारी ,श्रीकांत पाटील, संजय पाटील, उदय पाटील, एम. जे. पाटील, एस. के.पाटील, पंडीत पवार, शिवाजी भोसले, एच. वाय. शिंदे, हेमंत धनवडे, बाजीराव साळवी, मदन निकम आदीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुकत बैठकीत बोलतांना चेअरमन राहूल पवार शेजारी व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, बी.जी. बोराडे, दादासाहेब लाड,  आर. वाय. पाटील आदीसह अन्य मान्यवर.

बारावी रिपीटर विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; पुरवणी परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू



 
 कोल्हापूर/ प्रतिनिधी
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (इ.१२वी) फेब्रुवारी - मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर केला होता. या निकालानंतर आता जून - जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 
या परीक्षेसाठी खालील प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात - 
- फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
- पूर्वी परीक्षा फॉर्म भरलेले पण परीक्षेला अनुपस्थित राहिलेले खाजगी विद्यार्थी
- नवीन खाजगी उमेदवार ज्यांनी जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे
- श्रेणीसुधार योजना व तुरळक विषयांसाठी अर्ज करणारे विद्यार्थी
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे "Transfer of Credit" घेतलेले विद्यार्थी
अर्ज भरल्यानंतर संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज लॉगिनद्वारे "Pre-List" डाउनलोड करून त्यातील माहिती जनरल रजिस्टरशी पडताळून घ्यावी आणि अचूक असल्याची खात्री करून विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा असून त्याच्या तारखा खालीलप्रमाणे - 
महत्त्वाच्या सूचना - 
- अर्ज भरताना फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेतील माहिती स्वयंचलितपणे उपलब्ध असेल.
- श्रेणीसुधार करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु-मार्च २०२६, जून-जुलै २०२६) उपलब्ध राहतील.
- शुल्क भरणे हे केवळ ICICI बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्ये NEFT/RTGS च्या माध्यमातून करावे लागेल. जुन्या बँकांचे चलन वापरू नये व रोखीने भरणा स्वीकारला जाणार नाही.
- शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्र दिले जाणार नाही.
- नियमित आणि विलंब शुल्काच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.
- अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे रक्कम भरावयाची तारीख
शुकवार दि.२३/०५/२०२५ असेल
  उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख
सोमवार दि.२६/०५/२०२५ असेल
  विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा
नियमित शुल्क भरावयाची तारीख बुधवार, दिनांक ०७/०५/२०२५ ते शनिवार, दिनांक १७/०५/२०२५ व
विलंब शुल्क भरावयाची तारीख रविवार, दिनांक १८/०५/२०२५ ते गुरूवार, दिनांक २२/०५/२०२५
पर्यंत असेल अशी माहिती प्रसिध्दीस कोल्हापूर मंडळ 
 विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे १२ वी परीक्षेतकला व विज्ञान शाखेत दैदिप्यमान यश



पेठवडगाव /प्रतिनिधी


 शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावचा १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९८.९९ टक्के ,कला शाखेचा निकाल ८२.१४ टक्के इतका लागला असून ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९० टक्के इतका लागल्याने ज्युनिअर कॉलेजने दैदिप्यमान यश संपादित केले आहे.
      विज्ञान शाखा यश संपादित विद्यार्थी                            प्रथम क्रंमाक कु.संस्कार रणजीत पाटील         (82.83% ),द्वितीय क्रमांक कु. अस्मी सचिन मोरे
  ( 81.33 ),तृतीय क्रमांक  कु. सानिया सुरेश अनुसे 
   ( 80% )
 कला शाखा यश संपादित विद्यार्थी
 प्रथम क्रमांक  कु. रिया गणपती बिद्रे (81.17% ),द्वितीय क्रमांक कु. आदिती अंकुश  सुतार 
(68.17% ), तृतीय क्रमांक  कु. सोनल विलास वागवे 
(  66.50% )
    या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई,  चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे- देसाई , प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य ए. ए.पन्हाळकर, संस्थेचे मुख्य लिपिक  के. बी. वाघमोडे  यांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका  सौ. आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक  एस. एच. निर्मळे , पर्यवेक्षिका 
सौ. यु.सी. पाखरे, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. ज्युनिअर कॉलेजने बारावी परीक्षेतील निकालाची यशस्वी परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने सर्व विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यातून वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे अभिनंदन होत आहे.

Tuesday, 6 May 2025

मौजे वडगांव येथे निराधारांना मंजूरी पत्राचे वाटप

हेरले (प्रतिनिधी )
 संजय गांधी निराधार अनुदान योजना हि आर्थिक दृष्ट्या कमकुवत, निराधार ,अपंग ,विधवा , व घटस्फोटित महिलांसाठी राबविली जाते . या उपक्रमामुळे अनेक कुटूंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे .
     संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजने अंतर्गत गावातील ४५ लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप सरपंच कस्तुरी पाटील व तलाठी सचिन चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले . याकामी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक,आमदार अशोकराव माने , संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाकीर भालदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
       या कार्यक्रमास उपसरपंच स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगेपाटील, सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , अविनाश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , प्रकाश कांबरे, महमंद जमादार, महालिंग जंगम , यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .

Tuesday, 15 April 2025

गिरीष फोंडे निलबंन विरोधात निघणा-या मूक मोर्चात शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिक्षक समाजसेवक म्हणून गेली अनेक वर्षे सातत्याने शैक्षणिक चळवळीतून शिक्षकांचे प्रश्न मांडणारे तसेच सामाजिक क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध अग्रेसरपणे लढणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक व समाजसेवक गिरीष  फोंडे यांच्या अवैध निलंबनास विरोध करून त्यांचे निलंबन त्वरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मागे घ्यावे यासाठी गुरुवार १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भवानी मंडपातून महामनगरपालिकेवर निघणा-या भव्य मूकमोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार आहे असा निर्णय व्यासपीठाच्या विद्याभवन येथे झालेल्या सभेत घेण्यात आला. ही सभा शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

   शैक्षणिक व समाजिक चळवळीमध्ये काम करणा-या कार्यकत्यास अशा प्रकारची क्रूर वागणूक देणे हे अन्यायकारक आहे असे उपस्थित विविध संघटनांच्या सदस्यांनी मत वक्त केले. या बैठकीस राहुल पवार,
 आर.वाय. पाटील, राजेश वरक, भरत रसाळे, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, एस. जे. गोंधळी, राजेंद्र कोरे, एस. के. पाटील, बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, सुदेश जाधव जयसिंग पोवार,सतिश लोहार,संजय पाटील आर.डी. पाटील आदी उपस्थित होते.

Thursday, 10 April 2025

राज्यात ३१ हजार विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती वितरित

** 

शिष्यवृत्तीसाठी आधार सीडिंग आवश्यक

कोल्हापूर /प्रतिनिधी

नुकत्याच संपलेल्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील ३१ हजार विद्यार्थ्यांना एकूण सुमारे ३८ कोटी रुपये एनएमएमएस शिष्यवृत्ती रकमेकचे वितरण केंद्रशासनाने थेट बँक खात्यावर केले आहे.

महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) अंतर्गत अपेक्षित ४०,५५० पैकी एकूण 36,376 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 35,414 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, नवीन 8,937 आणि नूतनीकरण 22,730 अशा एकूण 31,667 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे. 

शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे.
उर्वरित सुमारे 3 हजार सातशे विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत सीडिंग केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले आधार-सीडेड खाते तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

*एनएमएमएस शिष्यवृत्तीचा उद्देश:* 
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांनी आपली बँक खाते माहिती अद्ययावत ठेवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना असून, सन 2007-08 पासून ही योजना सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानीत शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता 8 वीतील विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात, असे माजी राज्य समन्वयक तथा कोल्हापूर-कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

*शिष्यवृत्तीचे स्वरूप आणि पात्रतेचे निकष:*

१.इयत्ता 9 वी ते 12 वी अखेर 4 वर्षांसाठी दरमहा 1,000 रुपये (वार्षिक 12,000 रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.

२.पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

३.शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना योजना लागू आहे.

४.केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाच्या वसतिगृह सवलतीतील विद्यार्थी अपात्र असतात.

५.इयत्ता 10 वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम घेतल्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.

६.इयत्ता 10 वीमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60% पेक्षा जास्त गुण आवश्यक; अनुसूचित जाती/जमातीसाठी 55% गुण आवश्यक.

७.विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आवश्यक असून, संयुक्त खाते ग्राह्य धरले जाणार नाही.

८.विद्यार्थीचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे.

*उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी ऑफलाइन* 
सन 2024-25 मध्ये निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन एस पी पोर्टलवर या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला नव्हता किंवा अर्ज पडताळणीसाठी शाळा स्तरावर प्रलंबित होते, अशा ४,१७४ पैकी ३ हजार दोनशे विद्यार्थ्यांच्या अर्जांची ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत, जिल्हास्तरावर शिक्षण अधिकारी योजना यांच्याकडून ऑफलाइन पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांची माहिती एक्सेल शीट मध्ये योजना संचालनालयाने १५ एप्रिल पर्यंत मागवली आहे. शिवाय त्यातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती आणि बँक तपशील शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडून मागविण्यात आले आहेत. त्यामुळे आधार सीडिंग बाकी असलेल्या ३ हजार सातशे आणि पडताळणी बाकी असलेल्या ३ हजार दोनशे अशा आणखी एकूण ७ विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती मिळेल अशी शक्यता आहे.

*NMMS परीक्षा आणि निकाल:* 
चालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता मागील डिसेंबर 2024 मध्ये NMMS विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल 1 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्रासाठी 11,682 शिष्यवृत्तींचा कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित करण्यात आला आहे.

 महाराष्ट्राच्या राज्यातील आरक्षणानुसार संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर मधून 1703 विद्यार्थांची निवड झाली आहे, तसेच सर्वात कमी मुंबई दक्षिण मधून 45 विद्यार्थांची निवड झाली आहे.

या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती  प्राप्तीसाठी त्यांच्या बँक खात्याचे आधारशी सीडिंग त्वरित करावे. तसेच निकाल आणि आधारवरील विद्यार्थ्याचे नाव आणि जन्मतारीख योग्य असल्याची खात्री करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

Sunday, 6 April 2025

डॉ प्रभुदास खाबडे यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे  यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या बद्दल त्यांचा सत्कार माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यावर त्यांनी  पीएचडी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. चळवळ कशी असते यांचा परिपूर्ण अभ्यास करून पीएचडी मिळवली या ज्ञानाचा उपयोग करून  समाजात नक्कीच चांगले काम करून दाखवणार यासाठी पुढील वाटचालीस त्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार कार्यक्रमासाठी माजी सभापती राजेश पाटील, उपसरपंच निलोफर खतीब, माजी उपसरपंच विजय भोसले, मुनीर जमादार, रवी चौगुले, मंदार गडकरी, शशुपाल कुरणे, बाळासो चौगुले, अशोक कदम, कांत कुरणे, सनातन कदम, बाबुराव भोसले, प्रशांत खाबडे, जालिंदर उलस्वार, रणजीत कटकोळे आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फोटो 
डॉ प्रभुदास खाबडे यांचा सत्कार करतांना माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, माजी सभापती राजेश पाटील मुनीर जमादार, विजय भोसले आदी.

Saturday, 29 March 2025

विभागात दहावी परीक्षेत कॉपी प्रकरणांचा रकाना निरंकच !


बारावी परीक्षेत सातारा निरंक, कोल्हापूर एक, तर सांगलीत सहा  प्रकरणे.


कोल्हापूर / प्रतिनिधी

 विभागीय मंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये परीक्षेपूर्वी अडीच महिन्यांपासून विविध उपक्रमाद्वारे सुरू केलेली जागृती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांचे योग्य नियोजन, परीक्षा संचालनातील सर्व घटकांनी यथोचित पार पाडलेली जबाबदारी यामुळे यंदाही दहावी बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणांचा कोल्हापुर विभागाचा रकाना निरंकच राहिला आहे. तर बारावी परीक्षेत विभागात सात प्रकरणांची नोंद झाली असून सर्व सात प्रकरणे प्रतिबंधात्मक कारवाईशी निगडित आहेत. 

विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या परीक्षाविषयक गुणात्मक उपक्रमामुळे विभागातील शाळा, विद्यार्थी व पालकांच्याही मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येत असून यंदा प्रथमच कॉपीमुक्त परीक्षा अभियान खऱ्या अर्थाने प्रभावी ठरले आहे.

विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी पदभार घेतल्यापासूनच गैरप्रकारमुक्त परीक्षेची पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी विविध परीक्षांमध्ये राज्यस्तरावर केलेल्या कामकाजाचा तगडा अनुभव त्यांच्या कामी आला. विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात जिल्हास्तरावर सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेऊन विभागीय मंडळाच्या योजना व परीक्षेविषयी इत्यंभूत माहिती दिली. परीक्षेत गैरप्रकार घडल्यास कारवाईचा इशाराही दिला. जिल्हास्तरावरील बैठकी प्रमाणेच शाळास्तरावर संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी- पालक - शिक्षक यांच्यामध्ये जागृती करण्याबाबत निर्देश दिले. त्याच जोडीला कॉपीमुक्तीची शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्याबाबत निर्देश दिले. ताणतणावमुक्त परीक्षा कशी देता येईल, प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे, परीक्षापूर्व व परीक्षा काळात घ्यायची आरोग्य व आहाराची काळजी याबाबत तिन्ही जिल्ह्यात स्वतंत्रपणे स्थानिक तज्ञांच्या मदतीने ऑनलाइन चर्चासत्रे आयोजित केली, त्याचे थेट प्रक्षेपण शाळाशाळांमधून केले गेले.


*विभागातील उपक्रमांची दखल अन् राज्यस्तरावर अवलंब*

गैरप्रकारमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने कोल्हापूर विभागात घेण्यात आलेल्या उपक्रमाप्रमाणेच राज्यस्तरावर कॉपीमुक्त परीक्षा अभियान २० ते २६ जानेवारी  या कालावधीत घेण्यात आले. राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना ... या विषयावर स्वतंत्रपणे  कोल्हापुरातील विषयतज्ञांच्या मदतीने विभागीय मंडळाने व्हिडिओ तयार केला. तो राज्यमंडळाने सर्वांसाठी यूट्यूबवर उपलब्ध करून दिला. राज्यभरातून या उपक्रमाचे स्वागत झाले. या ध्वनिचित्रफिती शाळा शाळांमधून दाखवण्यात आल्या. दहावीच्या ध्वनीचित्रफितीस तर एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले.
कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित केलेल्या सप्ताहातील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन म्हणजे शिक्षासूची वाचन, उत्तरपत्रिकेवरील सुचना वाचन, पालक सभा, ग्रामस्थ सभा, प्रभात फेरी, उद्बोधनवर्गाचे आयोजन करण्यात आले.

*चालू वर्षी खऱ्या अर्थाने परीक्षा*

कोल्हापूर विभागीय मंडळाची स्थापना सन १९९२ मध्ये झाली असून त्यावेळी मंडळात सातारा, सांगली, कोल्हापूर,रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होता. सन २०१२ मध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे कोकण विभागीय मंडळ स्थापित झाले. बोर्ड परीक्षेचे गांभीर्य विविध कारणांनी मागील १० ते १५ वर्षात कमी होत गेले. कोरोना कालावधीपासून तर त्यात फारच शिथिलता आली. पर्यायाने शिस्त व अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ लागला. 

यावर्षी विभागाने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर शाळांनी सराव व उजळणी दक्षतापूर्वक घ्यायला सुरुवात केली, विद्यार्थी अभ्यासाला लागले, शिस्तीतही सुधारणा होताना दिसत आहे.चालू वर्षाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर पेपरच्या काळात निरव शांतता दिसून आली. केंद्राबाहेरील पळापळ आणि अंतर्गत चलबिचल जवळपास संपुष्टात आली. एरवी दिसणारे पुस्तकांचे व कॉपीचे ढीग गायब झाले. गैरप्रकार करणारे, उत्तेजन देणारे आणि मदत करणारे यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आणि परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याचाही सुपरिणाम दिसून आला. परीक्षा संचलन करणाऱ्या केंद्रसंचालक, वर्गावरील सुपरवायझर यांचेही काम सोपे झाले. त्यामुळे यंदाची बोर्ड परीक्षा खरी कसोटी ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्व घटकातून येत आहेत.


*विभागीय मंडळ आणि जिल्हा दक्षता समित्यांचा समन्वय*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमातील कॉपी विरोधी अभियान या कृतीकार्यक्रमाची  अंमलबजावणी करताना इयत्ता इ. १० वी व इ.१२वी च्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडणे हे आव्हान मंडळासमोर होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त एस पी सिंग,राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

विभागीय मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान सात भरारी पथकांचे नियोजन केले जाते. तथापि चालू वर्षी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ऑनलाइन बैठकीद्वारे परीक्षेत गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हास्तर, तालुकास्तरावरून महसूल व इतर अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. सर्व केंद्रांवर बैठी पथके नेमण्यात आली. भरारी पथकांची संख्या वाढल्याने प्रत्येक केंद्रावर भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यात विशेष लक्ष घातले होते.

तर उपद्रवी व संवेदनशील केंद्रांबाबत विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. मागील पाच वर्षात गैरप्रकार घडलेल्या केंद्रांवरील केंद्रसंचालकांसह सर्व कर्मचारी वर्ग बदलण्यात आल्याने त्याचाही धाक निर्माण झाला. संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण ही करण्यात आले. दुर्लक्षित असलेल्या बारावी ऑनलाईन परीक्षेतबाबतही सूक्ष्म नियोजन करण्यात आले. परीक्षा कालावधीत पेपर दिवशी सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सांगली राजेसाहेब लोंढे, कोल्हापूर डॉ. एकनाथ आंबोकर यांच्याशी सातत्याने होणाऱ्या छोटेखानी ऑनलाईन बैठका फायदेशीर ठरल्या.

*दहावी परीक्षेत कॉपीमुक्तीची हॅट्रिक*

चालूवर्षीसह मागील तीन परीक्षेत कोल्हापूर विभागात दहावी परीक्षेत एकाही प्रकारची नोंद नाही, यात विभागाने हॅट्रिक साधली आहे. जिल्हानिहाय विचार करता मागील पाच दहावीच्या बोर्ड परीक्षेत सांगली जिल्ह्यात एकाही प्रकाराची नोंद नाही.
मागील बारावीच्या दोन बोर्ड परीक्षेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकाही कॉपीप्रकाराची नोंद नव्हती. चालू वर्षी सांगली सहा व कोल्हापूर एका प्रकाराची नोंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यांची हॅट्रिक हुकली आहे. साताऱ्यात बारावी परीक्षेत मागील व चालू वर्षी एकही प्रकाराची नोंद नाही. चालू वर्षीच्या परीक्षेत विभागात बारावी परीक्षेत सात प्रकाराची नोंद झाली असून सांगलीतील सहा प्रकार रसायनशास्त्र व कोल्हापुरातील प्रकार गणित पेपरवेळी झाले आहेत. त्यांच्यावर मंडळ नियमानुसार कारवाई होणार आहे. 
लगतच्या कॉपीमुक्त मुक्त परीक्षेची संस्कृती रुजलेल्या कोकण विभागीय मंडळात केवळ एका कॉपी प्रकाराची नोंद असून राज्यात कॉपीमुक्तीत कोकण मंडळ अव्वल स्थानी आहे, तर कोल्हापूर विभागीय मंडळ दुसऱ्या स्थानी आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

"चालू वर्षाच्या परीक्षेत अनेक सकारात्मक बाबी पुढे आल्या आहेत, क्षेत्रिय यंत्रणेचे चांगले सहकार्य मिळाल्याने गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यात यश आले.
-सुभाष चौगुले, विभागीय सचिव. 

"विद्यार्थी पालकांसह परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची मानसिकता बदलण्यात बऱ्याच अंशी यश आले. परीक्षा देणाऱ्या व घेणाऱ्या या दोन्ही घटकांचा यावर्षी कस लागला. निकालानंतर येत्या शैक्षणिक वर्षात अभियानाचे दूरगामी व इष्ट परिणाम दिसतील. 
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ

Monday, 24 March 2025

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या आझाद मैदानतील आंदोलनातून साधला जुन्या पेन्शन मिळण्याचा राजमार्ग… प्रा. विजय शिरोळकर


हेरले /प्रतिनिधी


            आझाद मैदान मुंबई येथे १७ ते २१ मार्च अखेर आंदोलन पार पडले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठकीसाठी संघटनेने राज्याध्यक्ष  प्रा. विजय शिरोळकर, प्रा. योगेश्वर निकम,  प्रा. संपत कदम,भास्कर देशमुख  काकासाहेब कोल्हे  सहभागी झाले होते. शिक्षण मंत्र्यांनी यूपीएस/ एनपीएस स्वीकार करावा म्हणून आग्रह केला. पण २००५ पूर्वी टप्पा अनुदान असणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही असे ठामपणे सांगितले. टप्पा अनुदानावर  २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीचा अहवालानुसार  जुनी पेन्शन देण्यात यावी याकरिता आग्रह धरला.शिक्षण मंत्र्यांनी निवेदनावरती टिपणी टाकून कार्यवाही करिता  शिक्षण सचिव यांना आदेशित केले. आपला विषय अधिकृतरित्या शिक्षण सचिवांच्याकडे  पोहोचलेने जुने पेन्शनची दारे उघडली गेली हे आंदोलनामुळे  मिळालेले यश हेही नसे थोडक असा आशावाद संघटनेने व्यक्त केला. पुढे  शिक्षण सचिवांच्याकडे कार्यवाहीसाठी गेलेले निवेदनाआधारे  प्रस्ताव तयार करून तो अर्थ खात्याकडे पाठवावा यासाठी नाम.प्रकाश आबिटकर,नाम.चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. शिरोळकर म्हणाले.
       बीड जिल्हाध्यक्ष प्रा.गवते यांनी अभ्यागताच्या भेटीचे नियोजन उत्तमप्रकारे पार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे  आमदार विजयसिंह पंडित, गेवराई बीड यांनी आंदोलनास भेट देऊन, दादांच्याकडे हा विषय ताकतीने मांडू असे आश्वासित केले.  शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,शिक्षक आमदार जयंत आसगावकर  यांची भेट घेऊन संघटनेने चर्चा केली. आंदोलनास कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आंदोलनास भेट देऊन पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  असा विश्वास दिला. आमदार नाना पटोले  यांनी भेट देऊन तुमचा विषय काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये ताकतीने मांडेल असे आश्वासित केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे , कायम  विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष  खंडेराव जगदाळे  पेन्शन संघर्ष समितीच्या  संगीताताई शिंदे, सचिन पगार , शिक्षक नेत्या शुभांगीताई पाटील , वितेश खांडेकर,  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष  तानाजीराव माने  व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन करुन जाहीर पाठिंबा दिला.आझाद मैदान आंदोलन यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, कोषाध्यक्ष प्रा. तानाजी शेळके, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख  अजित सावंत  संपर्कप्रमुख भास्कर देशमुख , ठाणे जिल्हाध्यक्ष राजू लहासे काकासाहेब कोल्हे, प्रा.निशिकांत कडू, आदी प्रयत्न केले. बहुतांश  जिल्हाध्यक्ष, , पदाअधिकारी , मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, पेन्शनग्रस्त बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो 
शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना प्रा. विजय शिरोळकर व अन्य पदाधिकारी.

Friday, 21 March 2025

हेरले येथील प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट



हेरले/ प्रतिनिधी
१०० दिवस कृती आराखड्यांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावांमध्ये भेटी देऊन शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात अशा सूचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. याच्या अनुषंगाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हेरले (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळा शाळा नंबर दोन हेरले व कन्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
      यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी जीवनात चांगला अभ्यास करून यश प्राप्त करावे.आज शाळेमध्ये भेट देऊन वर्गाची पाहणी केली.तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
 या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत  सरपंच राहुल शेटे,यांनी  केले.
   यावेळी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले,विस्तार अधिकारी ए एस कटारे,विस्तार अधिकारी नेमिनाथ पाटील, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत अधिकारी बी.एस .कांबळे,पोलिस पाटील नयन पाटील, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय राबाडे, शाळा नं 2  चे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती कोरे, हेरले गावाचे,मंडल अधिकारी नविली बेळनेकर, तलाठी सचिन चांदणे,महमद जमादार, सुनील मगदुम, राहुल निंबाळकर, रोजगार सहाय्यक सुरज पाटील तिन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

फ़ोटो 
-हेरले येथील केंद्र शाळेच्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे त्यांच्या सोबत अधिकारी वर्ग.

Thursday, 20 March 2025

ठरलं तर मग..! दहावी बारावीनंतर आता पालकांची परीक्षा.


•अजूनही करा ऑनलाइन नोंदणी व जोडणी, करा पेपरचा सराव अन् द्या परीक्षा..!



कोणतेही परीक्षा शुल्क नाही. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत तीन तासांची परीक्षा.

•साक्षरतेचे अधुरे स्वप्न साकार करण्याची संधी.

कोल्हापूर / प्रतिनिधी

प्रौढ शिक्षण ऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण' या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) ही परीक्षा रविवारी २३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली आहे. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पंधरा वर्षे व त्या पुढील जेष्ठांना मिळाली आहे.

याबाबत उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मागील शैक्षणिक वर्षात ही परीक्षा १७ मार्च २०२४ रोजी घेण्यात आली होती. वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.असाक्षर व स्वयंसेवक ऑनलाइन नोंदणी उल्लास ॲपवर वर्षभर सुरू असते. ज्या शाळेतून असाक्षरांची नोंदणी झाली आहे त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असाक्षरांनी त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा द्यायची आहे.

 राज्य मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत संपन्न झाली आहे. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा ज्येष्ठांच्या परीक्षेसाठी कामाला लागली आहे.

मागील शैक्षणिक वर्षात १७ मार्च रोजी झालेल्या एफएलएनएटी परीक्षेस राज्यातून ४ लक्ष ५९ हजार इतके प्रौढ असाक्षर परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४ लक्ष २५ हजार उत्तीर्ण झाले. ही लेखी परीक्षा एकूण १५० गुणांची असून वाचन ५०, लेखन ५०, व संख्याज्ञान ५० अशी गुणविभागणी आहे. प्रत्येक भागात १६.५ व एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात ५ लक्ष ७७ हजार इतक्या असाक्षरांच्या नोंदणीचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १९ मार्च अखेर ५ लक्ष ६४ हजार ७५१ नोंदणी झाली आहे. त्यात १ लक्ष ६१ हजार ४६१ पुरुष तर ४ लक्ष ३ हजार ११७ स्त्रिया आणि ७३ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली आहे.मागील वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले, तसेच मागील वर्षात उत्तीर्ण होऊ न शकलेले आणि चालू वर्षात नव्याने नोंदणी झालेले असे एकूण सुमारे ८ लक्ष ४ हजार एवढे असाक्षर परीक्षेस प्रविष्ट करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. असाक्षरांना शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून१ लक्ष ३३ हजार १४२ जणांची नोंदणी झाली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी संयुक्तपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळांवरही उल्लास कार्यक्रमाची जबाबदारी सोपवल्याने या कार्यक्रमास आणखी गती मिळत आहे. योजना शिक्षण संचालनालयाने या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय परीक्षा निरीक्षकांच्या निमित्त केल्या आहेत. शिवाय केंद्र शासन स्तरावरून महाराष्ट्रातील परीक्षेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक येणार आहेत.

कोल्हापूर विभागांतर्गत सातारा २३,२५२, सांगली १७,७८०, कोल्हापूर २९,६८०,रत्नागिरी १०,५७४ आणि सिंधुदुर्ग ६,५९६ अशा एकूण ८७,८८२असाक्षरांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय उपसंचालक महेश चोथे यांनी विभागातील जिल्ह्यांसाठी ऑनलाइन बैठक घेऊन संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यस्तरावरून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना या परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

उल्लास परीक्षेच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सराव प्रश्नपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता असाक्षर आजी-आजोबा, आई-बाबा, काका-मामा, काकू आणि  मावशी आपल्या पाल्यांसोबत अन् स्वयंसेवकांसोबत अभ्यासात गुंग झाले आहेत.

"असाक्षर व स्वयंसेवक नोंदणी आणि जोडणी उल्लास ॲपवर ऑनलाईन पद्धतीने शाळांमार्फत सुरू आहे. ज्यांची नोंदणी व जोडणी अद्याप होणे बाकी आहे, त्यांनी तातडीने करावी. परीक्षेचा सराव करावा.
-राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ.

मौजे वडगांव उपसरपंचपदी स्वप्नील चौगुले


हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगाव ( ता. हातकणंगले)सत्ताधारी जय शिवराय ग्रामविकास आघाडी कडून स्वप्नील चौगुले यांची मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली . यापूर्वीचे उपसरपंच रघूनाथ गोरड यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते . आघाडीच्या ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार चौगुले यांना संधी मिळाली . स्वप्नील चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि बिनविरोध निवड करण्यात आली . यासाठी जयशिवराय ग्रामविकास आघाडीच्या नेतेमंडळीनी प्रयत्न केले. यावेळी माजी उपसरपंच सुनिल खारेपाटणे ,  सुरेश कांबरे ,  रघुनाथ गोरड, ग्रा प . सदस्य नितिन घोरपडे ,सविता सावंत , सुनिता मोरे, सुवर्णा सुतार , दिपाली तराळ, मधुमती चौगुले, मिनाक्षी आकिवाटे , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे - पाटील, यांच्यासह जय शिवराय ग्रामविकास आघाडीचे सर्व नेते  मंडळी , व ग्रामस्थ  उपस्थित होते.

Monday, 17 March 2025

जिल्ह्यातील हजारो शिक्षक कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले

कोल्हापूर /प्रतिनिधी

संचमान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे आणि खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस येणार आहेत.  बहुजनांचे शिक्षण संपुष्टात महाराष्ट्रात मध्ययुगीन व्यवस्था लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाला सवाल विचारण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक कार्यकर्ते  आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. 
    यावेळी बोलताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष  प्रमोद तौंदकर म्हणाले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे सरकारी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे हे भारतीय संविधानाने आणि एनईपी ने सांगितले आहे पण अलीकडच्या काळामध्ये राज्यकर्ते आणि राज्यकर्त्यांच्या बरोबर अधिकारी सुद्धा शिक्षणावरचा खर्च कमी करत आहेत एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि तिच्याच मुलाचं म्हणजे भाच्याचं शिक्षण संपवायचं असा दुटप्पी धोरण सध्या शासन करत आहे या मुलांच्यासाठी जुन्याप्रमाणे संच मान्यता चालू ठेवली नाही तर भविष्य काळामध्ये गुलाम या शिक्षण पद्धतीतून निर्माण होतील हो ला हो म्हणणारे तरुण तयार होतील सर्वसामान्यांची मुलं ज्याने असंख्य स्वप्न पाहिले आहेत ती स्वप्ने उद्ध्वस्त होतील आणि शासन जगण्यापूर्ती मदत करते म्हणून ही मुलं झेंडे उडवायला फक्त हे राज्यकर्ते वापरतील म्हणून समाजाला सुद्धा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी या प्रशासन अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन निदर्शन केली पाहिजेत 
अर्जुन पाटील म्हणाले मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर भारताचे आर्थिक राजधानी आहे असा असताना शिक्षण सेवक पद या महाराष्ट्रात निर्माण करून दोन प्रवर्ग निर्माण केले आहेत आणि म्हणून शिक्षण सेवक पद रद्द करावे ही मागणी या निमित्ताने घेतली आहे
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये पहिली ते पाचवीच्या शाळांसाठी एक ते सात पटापर्यंत दोन शिक्षक आणि तिथून पुढे प्रत्येकी 30 पटला एक शिक्षक असे शिक्षक विद्यार्थी प्रमाण निश्चित असताना या कायद्याचा भंग करत महाराष्ट्र शासनाने दहा पटाखालील शाळांना एकच शिक्षक देण्याची तरतूद या नव्या शासन निर्णयावर केलेली आहे. तसेच कायद्यातील विद्यार्थी शिक्षक प्रमाणाच्या तरतुदीना छेद देत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंदच पडतील अशी व्यवस्था केली आहे. त्याचसोबत सहावी ते आठवीच्या वर्गांना पटाच्या कोणत्याही अटीशिवाय विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या तीन विषयांसाठी प्रत्येकी एक शिक्षक असे तीन वर्गशिक्षक  देणे अपेक्षित असताना नव्या जाचक अटी लादत 20 पेक्षा कमी पटाला एकच शिक्षक मंजूर करून त्यांच्यावर तीन वर्गांची आणि तीच विषयांची जबाबदारी टाकणारा अनाकलनीय निर्णय शासनाने घेतला आहे. आरटीई 2009 चा कायदा पूर्णतः मोडून काढणारा आणि पालकांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करणाऱ्या या शासन निर्णयाविरुद्ध शिक्षकांनी प्रचंड मोठ्या संख्येने आवाज उठवला.

यासोबतच समान काम समान वेतन या धोरणासनुसार शिक्षण सेवक पद रद्द करणे ही मागणी ही जोरकसपणे मांडण्यात आली. आपोआप वगळता इतर कोणत्याही खात्यामध्ये नियुक्तीच्या दिनांकापासून पूर्ण वेतन दिले जात असताना फक्त शिक्षकांनाच वेठबिगारासारखे राबवून घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे हे पदच रद्द करण्यात यावे आणि पूर्णवेळ शिक्षक नियुक्ती करण्यात यावी यांसह इतरही मागण्या मांडण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 2000 हून अधिक शिक्षक या धरणे आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपस्थित होते. यावेळी शिक्षक समितीच्या राधानगरी शाखेने या आंदोलनासाठी बनवलेली वेगवेगळी पोस्टर्स लक्षवेधी ठरली.
  याप्रसंगी प्रमोद तौदकर जिल्हाध्यक्ष, प्रभाकर कमळकर  सरचिटणीस, अर्जुन पाटील पुणे विभाग अध्यक्ष,रवळू पाटील जिल्हा नेते, गणपतराव मांडवकर कार्याध्यक्ष, सुनील कुंभार कोषाध्यक्ष 
 ज्योतीराम पाटील शिक्षक नेते,संदीप मगदूम - जिल्हा प्रवक्ते, वर्षा केनवडे महिला राज्याध्यक्ष,संगीता अस्वले महिला जिल्हाध्यक्ष, शुभांगी माळी सरचिटणीस, 
 राजेंद्र पाटील, रामदास झेंडे, सुरेश कोळी, 
 शिवाजी बोलके, बाबुराव परीट,सुधाकर सावंत शहर राज्याध्यक्ष,उमेश देसाई, हरिदास वरणे, बाळकृष्ण पाटील, अभिजीत काटकर, बाबा धुमाळ, अनिल भस्मे, कृष्णात भोसले, सचिन कोल्हापुरे, मारुती पाटील, संजय कुंभार, विनायक मगदूम, सुरेश पाटील, युवराज काटकर, विक्रम वाघरे, विकास पाटील, अरविंद पाटील, तुकाराम  मातले, राजू नाईक, धनाजी पाटील, एकनाथ आजगेकर, बाजीराव पाटील, राजू परीट, पूजा पाटील, चंद्रकांत पाटील, डी डी पाटील, यशवंत चौगुले, राजेश सोनपराते, कृष्णात कारंडे आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक समितीचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

Sunday, 16 March 2025

जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानावर अन्नत्याग साखळी उपोषण करणार प्रा. विजय शिरोळकर

    कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पुर्वी) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बजेट अधिवेशनादरम्यान उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलनाची सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने सोमवार  १७ तारखेपासून अन्नत्याग साखळी उपोषण करणार आहे. यामध्ये  २०० पेक्षा अधिक सेवानिवृत्त बांधव बेमुदत अन्नत्याग साखळी उपोषणास बसणार आहेत.

   यापूर्वी हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्यात आले होते. पुण्यामध्ये आयुक्त कार्यालय समोर निदर्शने केली होती. ५ मार्च पासून मंत्रालयात उपासमारपूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलनं छेडले होते. सदर आंदोलनात राज्य उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भास्कर देशमुख, मुंबई संपर्कप्रमुख नाना राजगे, ठाणे जिल्हाध्यक्ष राजू लहासे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विलास जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, प्रा. राजेंद्र गायकवाड नाशिक,  संजय मांडवकर राजापूर,माधव मुधोळकर नवी मुंबई, रवींद्र चव्हाण धुळे आदींच्या नेतृत्वाखाली विविध मंत्र्यांना व सचिवाना भेटून वस्तुस्थिती कथन करण्यात आले होते.

   उपरोक्त मागण्यांमध्ये संघटनेची मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावावी. मयत बांधवांच्या वारसदारांना तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना तात्काळ जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यात यावेत.  १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः / टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांना  १९८२ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे १००टक्के अनुदानित शाळेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदनित तुकडीवरील शिक्षकांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी. २००५  पूर्वी नियुक्त सर्वच विनाअनुदनित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सरकारकडून सुप्रीम कोर्टात न्यायालयीन बाबींमध्ये होकार पत्र देण्यात यावे. सदर मागण्या करता आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राज्यध्यक्ष विजय शिरोळकर, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, कार्याध्यक्ष
 प्रा. योगेश्वर निकम, सचिव प्राध्यापक अभिजीत धानोरकर, सहसचिव सुनील कांबळे, कोषाध्यक्ष 
प्रा. तानाजी शेळके, विधि सल्लागार अॅड गजानन एडोले आदींनी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे दिली.

Saturday, 15 March 2025

शिक्षक व सेवकांच्या २१ मार्चचा लक्षवेधी आक्रोश मोर्चास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा.


कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सन १९८२ / ८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिक,नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने  शुक्रवार दि. २१ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या लक्षवेधी आक्रोश मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा देण्याचे बैठकीत जाहिर करण्यात आले.व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
    लक्षवेधी आक्रोश आंदोलनामध्ये मागण्या पुढील प्रमाणे १९८२ /८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी, टप्पा अनुदानावरील शाळांना पुढील टप्पा मिळावा, शिक्षण सेवक पद रद्द व्हावे, डीसीपीएस धारक प्राथमिक, माध्यमिक, खाजगी प्राथमिक, नगर पालिका, महानगर पालिका शिक्षकांना मार्च २०२१नंतर डीसीपीएस रक्कमेवरील व्याज व शासन हिस्सा अनुदान मिळावे, अनुकंपा आणि कुटुंब निवृत्ती वेतन बाबतची कार्यवाही तात्काळ व्हावी, १५ मार्च २०२४ चा  संचमान्यतेचा अन्यायी  शासन निर्णय रद्द व्हावा,सातव्या वेतन आयोगातील वरीष्ठ वेतन श्रेणी त्रुटी दुरुस्त व्हावी, शिक्षकासाठी १०, २०, ३० आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, अनुकंपा शिक्षकासाठी टीईटी ची अट रद्द व्हावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वा. टाऊन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात येणार आहे.  सदर  बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करण्यात आला.
   या बैठकीस आर. वाय. पाटील,भरत रसाळे, शिवाजी माळकर, सुधाकर निर्मळे, सुदेश जाधव, करणसिंह सरनोबत, मंगेश धनवडे, सतीश लोहार, संतोष गायकवाड, प्रमोद पाटील, आनंदा बनकर, मारुती फाळके आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना  शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी अध्यक्ष एस. डी. लाड, भरत रसाळे, शिवाजी माळकर आदी मान्यवर.

Sunday, 9 March 2025

बारावीची ऑनलाईन बोर्ड परीक्षाही गैरप्रकारमुक्त


सीसीटीव्हीचा वॉच, बैठ्या व भरारी पथकाचीही नियुक्ती अन् लॅबची तपासणी

कोल्हापूर / प्रतिनिधी
येत्या बुधवार १२ मार्चपासून बोर्डाची सुरू होणारी बारावीच्या माहिती तंत्रज्ञान(आय टी) व सामान्य ज्ञान(जी के) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी आणि केंद्रसंचालकांना सक्त ताकीद दिली आहे. ऑनलाइन परीक्षा आयोजित केलेल्या सर्व संगणक प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले असून लेखी परीक्षेप्रमाणेच प्रत्येक केंद्रासाठी बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती जिल्हास्तरावरून करण्याच्याही सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.

बोर्डाची बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असून ११ मार्च रोजी लेखी परीक्षा (तुरळक विषय वगळता) संपत आहे. त्यानंतर १२ ते १८ मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोल्हापूर व कोकण विभागात या ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती झाली असून ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आयटी विषय मान्यता देण्यात आली आहे, त्याच कनिष्ठ महाविद्यालयात (काही अपवाद वगळता) परीक्षा केंद्र असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या खाजगी सैनिकी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची ऑनलाईन परीक्षाही ज्या त्या सैनिकी शाळेतच होणार आहे. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रत्येकी एक खाजगी सैनिकी शाळा आहे.
सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्र संचालक, आयटी शिक्षक पर्यवेक्षक यांना विभागीय मंडळाने परीक्षेबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले असून या सर्वांसह विद्यार्थ्यांसाठी माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.

इंग्रजी, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे तीन अनिवार्य विषय वगळता इतर विषयांकरिता वैकल्पिक विषय म्हणून कला, वाणिज्य व शास्त्र या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आय टी) हा विषय घेता येतो. कोल्हापूर विभागीय मंडळातील बारावीच्या २५,१७९ विद्यार्थ्यांनी तर कोकण विभागीय मंडळातील ४,८०३विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय घेतलेला आहे. कोल्हापूर मंडळात २२४ तर कोकण मंडळात ७० परीक्षा केंद्रांवर या विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तर कोल्हापूर विभागातील तिन्ही सैनिकी शाळेतील बारावीच्या एकूण ८८ व कोकण मंडळातील दोन सैनिकी शाळेतील ७० विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची परीक्षा होणार आहे.

असे आहे वेळापत्रक - माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा १२,१५ व १७ मार्च रोजी सकाळी ११ ते १:३० आणि दुपारी ३:०० ते ५:३० या वेळेत बॅचनुसार होणार आहे. तर सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा १५,१७ व १८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत बॅच नुसार होणार आहे. लेखी परीक्षेप्रमाणे याही परीक्षेत दहा मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति तास २० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे.विहित वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तर परीक्षेच्या संगणक प्रयोगशाळेत अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

असे आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप- 
माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा अडीच तासांची व ८० गुणांची असून त्यात रिकाम्या जागा, चूक की बरोबर, बहुपर्यायी एक उत्तर बरोबर, दोन उत्तरे बरोबर, तीन उत्तरे बरोबर, जोड्या लावा, लघुत्तरी प्रश्न आणि एचटीएमएल कोड व प्रोग्रॅम लिहिणे असे प्रश्न असतील. २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर झालेली आहे.
तर सैनिकी शाळांमधील सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा २ तासांची १०० गुणांची आहे. या परीक्षेत शंभर प्रश्न असतील.

अशी आहेत जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे -
माहिती तंत्रज्ञान विषयाकरता सातारा ७१, सांगली ५३, कोल्हापूर १०० अशी कोल्हापूर विभागात एकूण २२४ तर कोकण मंडळात रत्नागिरी ४६, सिंधुदुर्ग २४ अशी एकूण ७० परीक्षा केंद्र आहेत. तर या पाचही जिल्ह्यात सामान्य ज्ञान विषयासाठी सैनिकी शाळेत प्रत्येकी एक परीक्षा केंद्र आहे.
माहिती तंत्रज्ञान विषयाकरिता सातारा 8,360 सांगली 4,351 कोल्हापूर 12,468 असे कोल्हापूर विभागात 25,179 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत. कोकण मंडळात रत्नागिरी 2,904 सिंधुदुर्ग 1,899 असे 4,803 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.
सामान्य ज्ञान विषयाकरता सातारा केवळ ५,सांगली 23, कोल्हापूर 60, रत्नागिरी 34 आणि सिंधुदुर्ग 36 असे परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.

गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा -

माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा घेत असताना शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाचा अवलंब काटेकोरपणे इतर विषयाच्या परीक्षेप्रमाणेच करावयाचा आहे. परीक्षा काळात सदर धोरणाचा अवलंब न केल्यास व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयावर तसेच परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक व शिपाई या सर्वांवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवा व शर्ती) नियमावली 1981 नुसार व माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act 2000) नुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

परीक्षा केंद्रावर आवश्यकतेनुसार केंद्र संचालक व आयटी टीचर यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र परीक्षार्थी, पर्यवेक्षक, शिपाई यांना मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास व बाळगण्यास मनाई आहे.
पर्यवेक्षक हे संगणक साक्षर असतील, मात्र ते माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक शिकवणारे शिक्षक नसतील. आयटी शिक्षकांना केवळ तांत्रिक मदतीसाठीच संगणक कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांची परीक्षापूर्व तपासणी करण्याच्या सूचना विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच परीक्षेपूर्वी वीज पुरवठा, इंटरनेट कनेक्शन व गती याबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १० मार्च रोजी सर्व परीक्षा केंद्रांवर चाचणी (ड्राय रन) घेण्यात येणार आहे.

•विभागीय व जिल्हा समन्वयकांची नियुक्ती - 
तांत्रिक मदतीसाठी कोल्हापूर विभागीय समन्वयक म्हणून सुषमा पाटील तर कोकण विभागीय समन्वयक म्हणून सचिन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
जिल्हानिहाय आयटी समन्वय पुढीलप्रमाणे, 
सातारा- विशाल शिंदे, किरण शिंदे, संपत चव्हाण.
सांगली-धनाजी शेवडे, शांतिनाथ पाटील. 
कोल्हापूर-बी एम वायकसकर, ज्योती गडगे, निलेश कांबळे. 
रत्नागिरी- समृद्धी बावधनकर. सिंधुदुर्ग- प्रसन्नकुमार मयेकर.

श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा (मल्टी स्टेट) शाखा हेरले च्या अध्यक्ष पदी राहुल माळी तर उपाध्यक्ष पदी नारायण खांडेकर यांची निवड


हेरले /प्रतिनिधी
 हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टी स्टेट ) शाखा हेरले च्या अध्यक्ष पदी राहुल माळी यांची तर उपाध्यक्ष पदी नारायण खांडेकर यांची निवड करण्यात आली.
  यावेळी नूतन संचालक नीलेश कोळेकर,श्रीपाल आलमान,दीपक थोरवत,अदिति आलमान,प्रतिक्षा पाटील यांची संचालक पदी निवड करण्यात आली. यासाठी मुख्य कार्यालयातील हेरले शाखा इन्चार्ज एस. एम. डब्ब सर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाखा मॅनेजर  यलगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    यावेळी शाखा कर्मचारी विवेक चौगुले, लोकेश खांडेकर व शंकर कोळेकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Wednesday, 5 March 2025

६ मार्चपासून मुंबई मंत्रालय येथे उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलन.

कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (2005 पुर्वी) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने बजेट अधिवेशना दरम्यान  दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे.  ६ मार्च ते  १६ मार्च कालावधीमध्ये उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलन. सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास १७ मार्च ते २१ मार्च  या कालावधीत अन्नत्याग साखळी उपोषण, निदर्शने, आझाद मैदान मुंबई उपरोक्त मागण्या करिता निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी दिली आहे.

   मयत बांधवांच्या वारसदारांना तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना तात्काळ जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यात यावेत. २१नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः / टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदानित शाळेत १नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती
विनाअनुदनित तुकडीवरील शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी. २००५ पूर्वी नियुक्त सर्वच विनाअनुदनित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. विनाअनुदनित शिक्षकांना सेवा उपदानसुद्धा नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून सेवाउपदान सातव्या सातव्या वेतन आयोगाप्रम सर्व शिक्षकांना देण्यात यावे.कृपया वरील मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंदोलनापूर्वीच मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढून आझाद मैदानावर होणारा आक्रोश उपासमार मेळावा थांबवावा ही नम्र विनंती. असे आवाहन अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी केले आहे.