Sunday 6 September 2020

mh9 NEWS

पावसाने मारली दडी,शेतकरी हतबल.लोकप्रतिनिधी ने लक्ष द्यावे,शेतकरी यांची मागणी

उदगीर प्रतिनिधी:- 

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी सह परीसरातील गावामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला आहे.डोंगरशेळकी सह परीसरात मृगनक्षञांच्या सुरूवातीला पावसाने चांगली सुरुवात केलीअसता.शेतकऱ्यांनी सोयाबीन,ज्वारी,मुग तुर,उडीद,आदि पिकांची पेरणीही केली. पिके पण चागले आले होते.यात मुग चांगला पिकतोय अशी असा असतांना पाऊस जास्त झाल्यामुळे मुगाची रास ही  खराब झाली.आता सोयाबीन पिक चागंले आले असताना शेंगा भरतेवेळी पावसाने मागील काही दिवसा पासून उघाड दिली आहे.अगोदरच बियांनाची उगवन झाली नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले होते.त्यात कोरोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांचे गणीत पुरते बिघडले आहे.परंतु पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतागृस्त झाला आहे.सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन तुर ज्वारी हे पिके कसदार जमिनीवर  चांगली तग  धरुन  आहेत तर हलक्या क्षेञातील पिकांना पावसाची गरज आहे या आठवड्यात पाऊस न झाल्यास ही पिके पावसा आभावी  करपुण जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चींनतेचे वातावरण आहे.एक दोन दिवसात पाऊस झाला तर सोयाबीन हे पिकेल नाहितर सोयाबीनचे ऊत्पादन फार मोठी  घट होनार आहे.सध्या गरज आहे लोकप्रतिनिधी नी बळीराजायाकडे लक्ष देण्याची. दिनांक 06/09/2020 रोजीचे मंडळनिहाय पर्जन्यमान (मी.मी.मध्ये)
मंडळ विभाग.आजचे.
1)उदगीर 00  (662) 2)नागलगाव 00(504),3)मोघा 00 (551),4)हेर 00(484)5)वाढवणा00(574)6)
नळगीर 00(621),7)देवर्जन 00(495),8) तोंडार 00(512)
आजचे एकून पर्जन्य- 00mm   
आजचे सरासरी पर्जन्य -00mm
एकूण पडलेले पर्जन्य -4403mm
एकूण सरासरी पर्जन्य -550.37mm असे आहे
     युवा शेतकरी यांची प्रतिक्रिया......
या संदर्भात MH9 ला बोलताना म्हणाले की पेरणी केली बियाने उगवले नाही दुबार पेरणी झाली उगवन ही झाली आता पावसाने दडी मारली शेतकरी यांचे नुकसान ही नुकसान होत असुन आर्थिक बाजु दिवसेन दिवस वाईट होत चालली आहे.लोकप्रतिनिधी बळीराजाकडे लक्ष द्यावे असे ही ते बोलताना म्हणाले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :