Tuesday 14 November 2023

mh9 NEWS

ज्ञानरचना आणि अध्यापन एक प्रभावी पध्दत - डॉ अजितकुमार पाटील सर ( पीएच डी )

(Knowledge Construction and Teaching)


अध्यापन ही गुंतागुंतीची आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे, हे सूक्ष्म अध्यापनामधून स्पार होतेच. कोणतीही कृती करताना नेमके मला काय करायचे आहे याची स्पष्ट जाणीव व्यक्तीला होणे गरजेचे असते. उदा. एखाद्या व्यक्तीला गावाला जायचे असेल तर त्यासा त्या गावाला जाण्याच्या वाहतुकीची माहिती घेणे, वाहतुकीचे साधन निश्चित करणे, त्या निवडलेल्या साधनाचे आरक्षण करणे, त्या गावातील मुक्कामानुसार स्वतःच्या सामानार्थी तयारी करणे, त्याचप्रमाणे आपल्या अनुपस्थितीत येथील कामाचे नियोजन करणे या कृती जितक्या चांगल्या होतील तितक्या प्रमाणात गावाला जाण्याचा कार्यक्रम यशस्वी होतो अन्यथा यामध्ये विस्कळीतपणा येतो.
वरील उदाहरणावरून हे लक्षात येते की, ज्या व्यक्तीला गावाला जायचे आहे त्या व्यक्तीच्या मनात खालील बाबींची स्पष्टता असणे गरजेचे असते.
१. कोणत्या गावाला जायचे ते ठिकाण
२. त्या गावाचे स्वरूप आणि सुविधा
३. त्या गावापर्यंत जाण्याच्या मार्गाचा परिचय
४. त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या आवश्यक बाबी हे चित्र जितके स्पष्ट तितकी पुढील प्रक्रिया सुलभ होते. अध्यापन ही अशीच प्रक्रिय आहे. अध्यापनामध्ये विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी शिक्षकाला विविध कृती करावयाच्य असतात. त्यामुळे त्याला काही गोष्टींची 'स्पष्ट जाणीव' होणे गरजेचे असते. यालाच आपण अध्यापनाविषयीचे अवबोध म्हणू.

ज्ञानरचना आणि अध्यापन

अध्यापनामध्ये समाविष्ट बाबी: कोणत्याही विषयाच्या अध्यापनामध्ये शिक्षकाला खालील चार प्रकारचे अवबोध स्पष्ट करून घ्यावे लागतात.

१ काय शिकवायचे आहे ?
२. कोणाला व कशासाठी शिकवायचे आहे ?
३. शिकवण्यासाठी वर्गाची व शाळेची भौतिक परिस्थिती कशी आहे ?
 ४. हे सर्व हाताळण्यासाठी माझ्या स्वतःमध्ये किती क्षमता आहे ?
प्रत्येक शिक्षक ही प्रथम एक व्यक्ती आहे. त्यामुळे मानसशास्त्राच्या नियमानुसार प्रत्येक संवेदनेला प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा अर्थ लावते. त्यामुळे एकाच संवेदनेचे विविध व्यक्तींमध्ये वेगवेगळे अवबोध निर्माण होतात. म्हणजे एकच आशय एकाच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोन भिन्न शिक्षकांनी शिकवला तर त्यांच्या अध्यापनामध्ये खूपच तफावत असते. याची अनेक उदाहरणे आपल्याला अनुभवायलाही मिळतात. शिक्षक-प्रशिक्षणाचा हेतू चांगला शिक्षक तयार करणे हा आहे. यासाठी अध्यापनाचे जरी भिन्न अवबोध तयार झाले तरी त्या भिन्न अवबोधांची एकूण गुणवत्ता ही चांगलीच असली पाहिजे. या दृष्टीने अध्यापनाच्या या अवबोधांचे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे.
१. आशय अवबोध: विविध विषयांतील संकल्पना, नियम, तत्त्वे तसेच त्यामध्ये समाविष्ट असलेली मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि आवश्यक असते.
१. शाळेभोवतालचा परिसर, लोकवस्ती व लोकजीवन
२. शाळेत प्रवेश करण्याचे रस्ते, शाळेचा आकार, शाळेमधील प्रयोगशाळा, इतिहास, भूगोल यांच्या विषय खोल्या आणि ग्रंथालय.
३. वर्गाचे शालेय इमारतीतील स्थान, आकार, प्रकाशयोजना, फलक, विद्युत पुरवठा, शैक्षणिक साधनासंदर्भातील सुविधा इत्यादी.
४. विद्यार्थ्यांची संख्या व बैठकव्यवस्था इत्यादी.
५. स्वक्षमता : अध्यापन ही बहुआयामी संकल्पना आहे व यामध्ये शिक्षक आणि त्याचे व्यक्तिमत्त्व यांचा फार मोठा प्रभाव आहे. शिक्षकांना समान स्तराचे प्रशिक्षण दिले पत्तेतील हजरजबाबीपणा, बहुश्रुतता, व्यासंग यांसारखे एकूण व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडणारे घटक असले तरीसुद्धा प्रत्येकाची बोलण्याची क्षमता, भाषेतील ओघवतेपणा, वक्तृत्वशैली, वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतात. या प्रत्येक घटकासंदर्भात तसेच सतात, किती प्रमाणात आहेत याबाबतचे आत्मनिरीक्षण करणे गरजेचे असते. विशिष्ट अध्यापनासाठी लागणाऱ्या आवश्यक गुणवैशिष्ट्यांसंदर्भात आपल्यामध्ये या क्षमता जाणीव आशयाच्या अध्यापनासंदर्भात एक शिक्षक म्हणून स्वतःची ओळख स्वतःला पटवणे, या बार्बीचा  विचार करणे गरजेचे आहे. अवबोध क्षेत्रामध्ये समावेश होतो. यासाठी खालील अवबोध स्पष्ट असणे
१. माझे आशयज्ञान किती प्रमाणात आहे ते वाढविण्याच्या दृष्टीने त्या संदर्भातील केलेले विविध स्रोतांची माहिती आहे का ?
२. त्या स्रोतांचा वापर आशयाचे उत्तमरित्या आकलन होण्यासाठी मी कसा करून घेईन ?
३. माझे आशयज्ञान चांगले आहे परंतु ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कौशल्ये माझ्याजवळ आहेत का ? ती मिळवण्याचा प्रयत्न करणे.
४. काही कौशल्ये आत्मसात केलेली असतील परंतु त्यामधील सखोलता प्राप्त ये करण्यासाठी किंवा इतर आवश्यक कौशल्यांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात मी सक्षम आहे का ? सक्षम बनण्यासाठी काय करावे याचा शोध घेणे.
५. माझ्याकडे असलेल्या कौशल्यांचे आशयानुसार तसेच विद्यार्थ्यांच्या आकलन-
या क्षमतेनुसार नियोजन मी स्वतः कसे करेन ?
६. विविध अध्यापन पद्धती, त्या संदर्भातील माहिती मला आहे का ? तसेच केवळ माहिती असण्यापेक्षा त्याद्वारे अध्यापन करता येते का ? याची जाणीव असणे आवश्यक आहे.
७. विविध अध्यापन पद्धतींची माहिती कोठून मिळवायची, संदर्भ पुस्तकांच्या वापराद्वारे मी माझे अध्यापन प्रभावी बनवू शकतो का ?
वास्तविक यावर तात्विक विचार व चर्चा होणे गरजेचे आहे. मूल्यमापन तंत्र वर्तनवादी मानसशास्त्रावर आधारित आहे. साधारण १९७० नंतर वर्तनवादाच्या मर्यादा  आल्या व बोधात्मक मानसशास्त्र, मेंदू आधारित अध्ययन या विचारांचे प्राबल्य वाढले. आता तर संपूर्ण शिक्षणप्रणाली ज्ञान रचनावाद या संकल्पनेभोवती गुंफली जात आहे.
या तत्त्वांनुसार 'शिक्षकाने अध्ययन अनुभव दिले म्हणजे शिकवणे संपले' असे न मानता विद्यार्थ्यांनी त्या अध्ययन अनुभवांशी कशी व किती प्रमाणात आंतरक्रिया केली यावर विद्यार्थ्यांचे अध्ययन म्हणजे त्याची ज्ञानप्राप्ती व पर्यायाने अध्यापनाची फलश्रुती अवलंबून आहे, असे म्हणावे लागते.
 विचारांमध्ये विद्यार्थी, आशय, शैक्षणिक साधने, प्रश्न इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक शिक्षकाला त्याच्या वर्गाध्यापनामध्ये भिन्न-भिन्न कृती कराव्या लागतात. त्यासाठी त्याला स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. या प्रमाणे असते. विशिष्ट वर्गात शिकविण्यासाठी काय काय करायचे याचे मानसिक चित्र शिक्षकाला तयार करावे लागेल. हेच चित्र कागदावर आणले की त्याच्या अध्यापनाचे नियोजन तयार झाले. एखादा नवशिका शिक्षक हे नियोजन सविस्तर करील. सरावानंतर तो केवळ टप्पांचे किंवा पायऱ्यांप्रमाणे नियोजन करील.

नियोजनामध्ये शिक्षक खालील तीन अवस्थांचा वापर करतात.

१. *शोधावस्था* : स्वतःच्या विषयाचे, विद्यार्थ्यांबाबतचे, अध्यापनाबाबतचे ज्ञान किती आहे? स्वतःला अध्यापनामध्ये किती, कसे व कोणते अनुभव आलेले आहेत ? अध्यापनातून नेमक्या कोणत्या बाबी साध्य करावयाच्या आहेत ? यांसारख्या मुद्द्यांचा विचार करून नियोजन कसे करायचे, हे शिक्षक ठरवितो.

२. *समस्या निराकरणावस्था* : विशिष्ट विद्यार्थ्यांच्या, वर्गाच्या तसेच विशिष्ट आशयाच्या काही गरजा असतात. या बाबींवर त्याला सविस्तर विचार करावा लागतो. या विचारांची दिशा, समस्या निराकरणाच्या पायऱ्यांप्रमाणे असते. त्या-त्या गरजांप्रमाणे शिक्षक नियोजनामध्ये बदल करतो.

३.*स्वयंमूल्यमापनावस्था* ही अवस्था कृतीनंतरची आहे. नियोजनाप्रमाणे कार्यवाही केली जाते. स्वतःच्या प्रत्येक कृतीचे मूल्यमापन करून कोणत्या बाबी नित्य कृती म्हणून स्वीकारायच्या, कोणत्या कृर्तीमध्ये जाणीवपूर्वक बदल करावयाचे हे ठरवितो. नित्य कृतींबाबत सविस्तर नियोजन करावे लागत नाही. नवीन बाबींचे सविस्तर नियोजन कसे करावयाचे, याबाबतचा तो पुढील नियोजनासाठी विचार करू लागतो.
म्हणून ज्ञानरचनावाद हा वापरताना शिक्षणाची आनंददायी शिक्षणाची सुरूवात झाली आहे असे म्हणावे लागेल.

       जय हिंद...

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :