Thursday 26 January 2017

mh9 NEWS

बैलगाडी शर्यतींना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

तामिळनाडूतल्या जलीकट्टूनंतर त्याधर्तीवर निवडणूक आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठन्याची शक्यता निर्माण झाली आहे ,यापूर्वी केंद्र सरकारने जुलै २०११मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतींवरही बंदी आली आहे  मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती.मात्र सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारचा निर्णय रद्द ठरवत  प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल दिला आता तामिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली, तशीच महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना मिळावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर बैलगाडी  संघटनांनि मांडल्यावर त्यांना आश्वासन देताना आपणही या स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्नशील असून, आचारसंहिता असल्याने तूर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू असे म्हणाल्याचे समजते 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :