Monday 6 May 2024

mh9 NEWS

मुलांच्या क्षमता ओळखून... डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर.

-------------------------------------
21 व्या शतकात आपण मुलाच्या भवितव्यासाठी 24 तास अहोरात्र कष्ट करत असतात पण,
" ज्याप्रमाणे प्रवासात प्रवासापेक्षा दिशा महत्वाची असते, त्याप्रमाणे आपल्या मुलाच्या क्षमता गुण इतर कौशल्य यांचा अभ्यास करून पालकांनी आपल्या मुलांसाठी योग्यच निर्णय घेतला तरच तो विद्यार्थी एकविसाव्या शतकातील महान भारत सत्ताधीश बनणार आहे "
 त्यासाठी  भारतातील सक्षम व आव्हानांना सामोर जाण्यासाठी किंवा त्यांना पेरण्यासाठी तो भारताचा आदर्श नागरिक बनणार आहे. मुलाच्या अंगी असणारे सुप्त गुण हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात, त्यामुळे तो जो पालक बनत आहे तो आई वडील त्या दोघांच्या संस्काराच्या बिजातूनच नवीन रोपटे जन्माला येत असते व त्यावर संस्कार रुपी अनमोल विचार,संस्कृती,संस्कार, व्यवहारज्ञान,धाडसी व  नेतृत्व जबाबदार पेलण्याची क्षमता मैत्रीपूर्ण समभाव एकता ,नेतृत्व ,सहनशीलता असे अनेक प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, संस्कृतीक, धार्मिक गुण विद्यार्थ्यांच्या अंगी येत असतात, व त्यामधून तो मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून व मित्रांच्या सहवासात राहून तो समाजातील व वैयक्तिक जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम बनणार आहे.
केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मूळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजात पुढे भरीय कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा. आपल्या घरातील एकमेकांशी सुसंवाद साधण्यासाठी 24 तासातील दहा मिनिटे वेळ काढलाच पाहिजे तरच एकमेकाचे असणारे नाते आपुलकीचे प्रेमाचे घट्ट राहणार आहे.
आज सगळा समाजच मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे चक्रावून गेला आहे. आजची मुले आईवडीलांनी सांगितलेले ऐकत नाहीत. आधीची मुले अमूक एक गोष्ट कर म्हटल्यावर ऐकायची. का ? म्हणून विचारत नव्हती. चित्रपट, दूरदर्शन, इंटरनेटवरील हिंसेचे, लैंगिततेथे अनिर्बंध उदात्तीकरण, हिंसेच्या भावनेला खतपाणी घालणे, मुलांना उत्तेजित करणाऱ्या व्हिडिओ गेम्स, मुलांची बिघडलेल्या मित्र-मैत्रिणींची संगत, त्यांच्याकडे पालकांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, स्वतः पालकांचे बेताल वागणे, आजूबाजूला फोफावत चाललेला चंगळवाद, या सगळ्यांचा यात थोडा थोडा वाटा आहे.
कुटुंबामधील मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे त्यासाठी नित्यनेमाने योगासन ध्यानधारणा दररोज 40 मिनिटे चालणे सुंदर विचार वाचत बसणे ऐकणे यासारखे छोटे छोटे गोष्टी केल्या तर नित्यनेमाने एकमेकांमध्ये राहणारे विचार एकमेकांच्या विचारांचा आदर राखला जातो त्याचे कारण मानसिक स्वास्थ नाही निर्मळ जीवन काय करेल साबण या उक्तीप्रमाणे ऐकण्यापेक्षा प्रात्यक्षिक किंवा वागण्यावर भर द्यावा तरच आपलं कुटुंब एका आदर्श कुटुंबासारखे राहणार आहे.
मुलांचे मनस्वास्थ्य ठीक नसेल, मूल्ये ढासळलेली कल्पनाविश्वात वावरायची सवय लागलेली असेल, तर मुले अयोग्य व चुकीचे निर्णय घेऊ शकतात. चुकीध वागले जाऊ शकते. विचार वजा केला की माणूस पशू किंवा यंत्र बनतो. गुणी, समंजस हरहुन्नरी मुले सगळ्यांनाच आवडतात. परंतु तसे घडवणे आपल्या हातात असते. त्याल आपण कितपत यशस्वी होतो ?

एकत्र कुटुंब हीच आपली पारंपरिक पद्धत होती. पूर्वी घरात खूप माणसे • असल्यामुळे मुले कशी मोठी व्हायची हे आईवडिलांना कळायचे नाही. घरात मोठे कुटुंब. त्यामुळे समवयस्क मुले एकमेकांबरोबर खेळायची, शाळेत जायची, मिळून अभ्यास करायची, झाडावर चढायची, नदीत पोहायला, सायकल चालवायला शिकायची, हे सगळे आपोआपच व्हायचे. आज काही तिकाणी एकाच घरात विभक्त कुटुंबे राहतात. त्यांच्यामधून विस्तवही जात नाही, दोघ भाऊ, सासू-सूना, जावा-जावा आपापसांत भांडतात. एकमेकांचे वाभाडे काढतात. मोठ्याने आवाज निघतात तेव्हा काही तरी चुकीचे, भीतीदायक घडते याची जाणीव होत असते, या घटना मेंदूच्या स्मरणकप्प्यात घट्ट रुतून बसतात. जिथे जिव्हाळा नाही त्या एकत्र कुटुंबाचेही दुष्परिणाम जास्त होतात. आईबाप करतात तसेच करायला पुलांना आवडते. आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्यांचे बोलणे, वागणे टिपकागदाप्रमाणे टिपून घेतात. सभोवतालच्या वागण्यातून, भावनेतून मुलांवर संस्कार होत असतात.
प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञांचे असे मत आहे की, आयुष्यात निर्माण होणाऱ्या बहुतेक मनोविकारांचे मूळ बालपणात आढळेल. या वयात ज्या त्रासदायक अथवा दुर्दैवी घटना घडतात त्या घटनांतून मुले खूप काही शिकतात. यातील काही घटना मुलांच्या दृष्टीने खूपच त्रासदायक आणि उपद्रवी असतात. आपण पुलाला, तू मूर्ख आहेस, कुरूप आहेस, अडाणी आहेस अशी नाय ठेवली तर त्यामुळे मुलांत सूडाची भावना उत्पन्न होते. सतत चिंता आणि काळजी तया होते. अयोग्य वागणूक आणि लक्षणे तयार होतात. हळूहळू घरापासून लांब लांब राहू लागतात. रात्री अपरात्री घरी येणे किंवा रात्रच्य घराबाहेर राहण, दारू, अंमली पदार्थ, जुगार यांसारखी व्यसने कवटाळणे, मुर्तीची छेड काढणे, चोरी, दरोडा, मारामारी, बलात्कारासारख गुन्हे घडतात.

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात चार ते सहा वर्षे वय अत्यंत महत्त्वाचे असते. या वयातील मुलगा असेल तर त्याला आईचे प्रेम एकट्याला मिळावे आणि मुलगी असेल तर तिला वडिलांच्या प्रेमात भागीदार नको असतो.
या काळात मुलाचे विश्व हे आई-बाबा, आजी-आजोबा, यापर्यंतच सीमित असते. पुढे शाळेच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणी, अभ्यास, शिक्षकांशी सहवासाला महत्त्व येते. या वर्षात जे अनुभव मुले घेतात त्यातूनच त्यांच्या ● व्यक्तिमत्वाची बांधणी होते.
आपण मुलांना सद्वचन केवळ जिभेवर घोळायला लावतो. ते सद्वचन मन, बुद्धी आणि कर्म यांनी अभिमंत्रित केले तरच मुले सुसंस्कृत बनतील, शाळेत आजही. अश्वत्थाम्याला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून पाजले जाते. केवळ पोपटपंची करणारे पाठांतर केले जाते. सर्वप्रथम आपण मुलांना मातृभाषेतून शिक्षण न देता इंग्रजी माध्यमातून सामोरे जाण्यास पुढे उभे करून त्यांना नकळत तणावाखाली नेण्याची सुरुवात करीत असतो.

आज घराघरात एकच मूल ही संकल्पना वाढत आहे. पण त्या एकाकडून भरपूर अपेक्षा असतात. त्यांना ओढ मुलाच्या ज्ञानाची नव्हे तर गुणांची वाटू लागली आहे. त्यामुळे पालकांचा दरारा सहन करीत मुलांना एका अनामिक भीतीने ग्रासले जाते. काही ठिकाणी तर विपरित स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पालकच मुलांना घाबरू लागले आहेत. याचे कारण अतिलाडामुळे मुल बेजबाबदार वागू लागली आहेत, जी जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन एका दगडात दोन पक्षी मारतात अतिलाडाचे विपरित परिणाम, अनेक समस्या अंगावर येऊ लागल्या.
आज आईवडील मुलांच्या वागण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मुले मोबाईल, लॅपटॉप यात मान खुपसून बसतात.
मुलांना अपेक्षा वाढत आहेत पण त्याप्रमाणे आई-वडील व पालकाचे पत्करलेल्या घरातील सदस्यांनी सुद्धा आपण कोणकोणते टीव्हीवरील मालिका पाहतो त्यांचे प्रत्यक्ष संस्कार म्हणून कसे घडतात त्याचा अभ्यास करावा त्यानुसार त्यांनी कोणत्या मालिका पहाव्या कोणत्या आदर्श मालिका पाहून नाहीये याची वेळापत्रक सुद्धा केले तर वावगे ठरणार नाही. मालिका पाहण्यात आईवडीलही मशगुल होतात, अभ्यासाच्या बाबतीत पालक 'रिंगमास्टर होत आहेत. याचा मुलांवर ताण पडतो. परंतु भीती, दबाव यामुळे त्यांना बोलून दाखवता येत नाही. त्यांच्या वागण्यातून त्यांचे ताण प्रगट होतात. त्यामुळे आपण मुलांचे मार्गदर्शक व्हावे, हुकूमशहा होऊ नये. मुलांकडून गुणांची अवास्तव अपेक्षा करू नये. कारण केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मुळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजातं पुढे भरीव कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रयाशील रूप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा. 'अभ्यास कर' हाच एक मंत्र मुलांना सतत ऐकवला जातो. मात्र त्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित केले जात नाही. वाचनाने त्यांची प्रगल्भता वाढेल. विचार करण्याची क्षमता वाढेल. आपल्या मुलांना, नवीन पिढीला नवीन विचारांची शिदोरी दयायची आहे. त्यांच्यात सुरक्षितपणाची भावना, आत्मविश्वास, सृजनशिलता वगैरे निर्माण होईल, जेणेकरून ती मुले या समाजव्यवस्थेला सामोरे जायला ताठ उभी राहू शकतील.
एकुणच आपले मुल हे एक स्वच्छ व सुंदर निर्झर आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक शैक्षणिक नैतिक भावनिक प्रदूषण झालेले दिसून येत नाही त्यामुळे तो संसार कुटुंबामध्येच तो आपल्या भारताचा आदर्श नागरिक घडत राहणार आहे एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्याच्यासमोर सुंदर विचार चांगली पुस्तक वाचणे चांगला मित्र जोडणे आपल्या आई-वडिलांचे संस्कार नुसार वागणे इत्यादी छोट्या गोष्टी केल्या तरी तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याचा क्षमतेचा विचार करून त्यास शिक्षण द्यावे.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :