Friday 2 December 2016

mh9 NEWS

बुलेट ट्रेन राहू देआधी आहे त्या ट्रेनचा वेग वाढवा

कोल्हापुरच्या वाट्याला रेलवेच्या बाबतीत कायमच निराशा आली आहे , मुळात छ़ शाहू महाराजांनी स्वत:ची जागा देऊन त्याकाळी दूरदृष्टीकोनातुन रेलवे कोल्हापुरपर्यंत आणली , आज सर्व लोकप्रतिनिधी रेलवेचा अग्रहक्काने मोफत प्रवास करतात ,पण कोल्हापुर रेलवेमार्ग विकासासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत ही शोकांतिका आहे

रस्तामार्गे कोल्हापुर ते मुंबई हे अंतर कारने अवघ्या ६ तासात पार होते ,
तर रेलवेला यासाठी १२ तास किमान व १४ तास कमाल लागतात ही कोल्हापुरवासियांसाठी शरमेची बाब आहे ,

साखर व गुळाची सर्वाधिक वाहतुक रेलवेमार्गेच होते ,
या मार्गावर दुपदरीकरण , विद्युतिकरण यांचा अभाव आहे , नविन कोणत्याही गाड्या कित्येक वर्षांपासुन सुरु झाल्या नाहीत

आता मा सुरेश प्रभु हे एक मराठी नेतृत्व रेलवेमंत्री पदी विराजमान आहेत , किमान त्यांच्याकडुन तरी कोल्हापुरच्या रेलवे विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त करूया

प्रभुसाहेब ट्विटरवरुन लोकांचे प्रश्न सोडवतात असे ऐकले आहे , यासाठी त्यांचा ट्विटर आयडी तुम्हाला येथे देत आहोत ,
@sureshpprabhu

या बातमीची लिंक त्याच्यापर्यंत व आपआपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जरुर पोहचवा हा तुम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे त्याचा जरुर वापर करा

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :