Wednesday 6 October 2021

mh9 NEWS

राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली गुणवंतांची खाण म्हणजे राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक अकरा कसबा बावडा.

     

  ----- एकविसाव्या विज्ञानयुगात टिकण्यासाठी व राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी गुणवंतांची खाण म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक आकरा कोल्हापूर होय. या शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाली ही शाळा पूर्वी लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा येथे घोड्याच्या पागेत सुरू करण्यात आली होती असे पूर्वीचे रेकॉर्डवरून दिसून येते त्या शाळेच्या शताब्दी महोत्सव तीन फेब्रुवारी 1975 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई, प्राचार्य आमदार एन डी पाटील ,आयुक्त द्वारकानाथ कपूर शिक्षण सभापती हिंदुराव साळोखे, कार्याध्यक्ष बा, द, पाटील,तेव्हाचे मुख्याध्यापक विश्वास जोदाळ यांच्या पुढाकाराने नवीन वास्तूत शाळा बांधण्यात आली होती. या शाळेत पद्मश्री डॉक्टर डी, वाय, पाटील, अडव्होकेट सुरेश आळवेकर ,शामराव पाटील प्रकाश जाखलेकर, इंजिनियर सलीम मुजावर, शिक्षण तज्ञ ग.रा. जाधव ,इलाई मुजावर आर. एल .पाटील व शासकीय सेवांमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पांडुरंग आळवेकर, आरती पिंगळे ,अवधूत पिंगळे, प्राध्यापक बाळकृष्ण चौगुले, शाहीर यशवंत कोळी, श्रीराम सोसायटी चे माजी सभापती बापुसो लाड, कोल्हापूर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष धोंडीराम रेडेकर तसेच पहिले  उपमहापौर शत्रुघ्न पाटील, मुख्याध्यापक आनंदराव पोवार ,शिक्षण सभापती अशोक जाधव इत्यादींनी योगदान दिलेले आहे.
 या शाळेमधील बहुसंख्य विद्यार्थी सामान्य कुटुंबांमधील कष्टकरी मोलमजुरी करणारे व शेतकरी वर्गातील आहेत. शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज मैदान, सुंदर शालेय परिसर, संगणकीय शिक्षण, डिजिटल वर्ग एज्युकेशन दिल्ली यांच्यामार्फत क्लास  सुरू आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय विविध स्पर्धा माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धा, कवायत स्पर्धा, भाषण स्पर्धा सामाजिक राष्ट्रीय प्रश्नावर समाज प्रबोधन करण्यासाठी विविध प्रश्नावर पथनाट्य सादरीकरण करत असतात त्यामध्ये मुलींचे शिक्षण, साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, मतदार राजा जागा हो, पल्स पोलिओ लसीकरण, महास्वच्छता अभियान ,प्लास्टिक बंदी, स्वच्छ पाणी तसेच एम टी एस परीक्षा ,भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, केटीएस, नवोदय परीक्षा मध्ये प्रेरणा थोरबोले, दिशा कांबळे यांची निवड झाली आहे या माध्यमातून जवळजवळ दरवर्षी शंभर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतात. 
मुलीचे शिक्षणासाठी मीना मंचच्या माध्यमातून किशोरी मेळावा आयोजित करण्यात येतो त्यामध्ये कराटे च्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येते .1मे ते 5 मे या दिवशी शाहू संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते की यामध्ये योगासने, ध्यानधारणा, लाठीकाठी, शुद्धलेखन, कूटप्रश्न ,इंग्रजी स्पष्ट वाचन स्पर्धा, बौद्धिक खेळ ,सूर्यनमस्कार, गणित कार्यशाळा ,कागदी पिशव्या यांची कार्यशाळा, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा ,मनशांती कार्यशाळा प्रभावी व्यक्तिमत्व कसे असावे यांची कार्यशाळा त्या माध्यमातून करण्याचे ध्येय साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत .दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती समाज कल्याण शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश, उत्कृष्ट पोषण आहार, दूरच्या विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत पास योजना हे सर्व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. प्रभागातील नगरसेविका माधुरी  संजय लाड यांच्या अथक प्रयत्नातून अकरा लाखाचे निधी शाळेसाठी भौतिक सुविधा साठी आणून शाळा सुसज्ज तयार केली आहे.भारतवीर मित्र मंडळाचे सुद्धा योगदान या शाळेसाठी आहे त्यामध्ये कार्यशाळा, वनसंरक्षण दिन, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी ते सतत शाळेला भौतिक सुविधा पुरवत असतात.      
   शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा देणारे ह्या शाळेत पहिली ते सातवी  शिकलेले विद्यार्थी अजितकुमार पाटील हे या शाळेचे सध्याचे केंद्रमुख्याध्यापक पदावर आहेत .त्यांनी विविध पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण जागृती ,प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा ,जीवन वाचवा, पक्ष्यांसाठी घरटी, ध्वनी प्रदूषण, विज्ञान शिबिर ,शुद्ध लेखन कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, या प्रकारचे विविध शैक्षणिक उपक्रमात व माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजर्षी शाहू मध्ये झाले आहे .माध्यमिक शिक्षण छत्रपती राजाराम हायस्कूल येथे झालेले आहे महाविद्यालयीन शिक्षण शहाजी कॉलेज येथे झाले आहे .त्यांची शैक्षणिक अहर्ता पाहिली तर एम ए मराठी, इतिहास, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, एम एड याच वर्षी त्यांनी मराठी विज्ञान साहित्य पीएचडी संपादन केलेले आहे .त्यानी आतापर्यंत 119 चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतले. त्यापैकी 18 आंतरराष्ट्रीय चर्चासत्र ,45 राष्ट्रीय संशोधन निबंध मराठी, इतिहास, पर्यावरण शास्त्र,समाजशास्त्र, राज्यशास्त्र,भूगोल, अर्थशास्त्र ,संख्याशास्त्र, हिंदी या विविध विषयावर शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांची चार पुस्तके, अठरा वैचारिक ,लेख दोन हस्तलिखितं या लेखणीच्या माध्यमातून समग्र साहित्याचे दर्शन दिसून येते.        
               कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व त्याच शाळेत उच्चविद्याविभूषित विद्यावाचस्पती ही पदवी संपादन करून एक अलौकिक असा इतिहास घडविला आहे .एकूणच शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील शिक्षकांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रश्नमंजुषा स्पर्धा,महात्मा गांधी ऑनलाइन भाषण  स्पर्धा यासारख्या ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आहे. प्रशासनाधिकारी एस. के .यादव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली शाळेचा दर्जा उच्च ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षक वृंद करत आहेत. " विद्यार्थी हेच दैवत " हे ब्रीदवाक्य मानून शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, इंग्रजी पदवीधर शिक्षक उत्तम कुंभार, टेक्नोसॅव्ही शिक्षक सुशील जाधव,अप निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या तमेजा मुजावर, गणित तज्ञ आसमा तांबोळी, मीना मंचच्या प्रमुख सुजाता आवटी, व्हिडिओ निर्मिती करणारे शिवशंभू गाटे, स्कॉलरशिप तज्ञ विद्या पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार ,उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, भारतवीर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी ,शाळेचे माजी विद्यार्थी पालक व मित्रांचचे सहकार्यातून हे ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदर्श नागरिक घडवत आहे.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :