Monday 21 February 2022

mh9 NEWS

छ.शिवराय संस्कार काळाची गरज - डॉ अजितकुमार पाटील

*
कोल्हापूर प्रतिनिधी 
कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समिती संचलित म न पा राजर्षी शाहू विद्यालयात शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.38 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वेशभूषा करून शाळेतील वातावरण शिवमय करून टाकले होते भगवा फेटा उपरणे साडी पताके अशा वेशभूषा मध्ये विद्यार्थी स्पर्धेसाठी आले होते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध प्रकारची शिवमय वेशभूषा करून स्पर्धेत भाग घेतला होता एकूण 38 विद्यार्थ्यांपैकी कल्पना मैलारी पायल पाटील वेदांतिका पाटील राजनंदनी कारंडे अक्षरा लोंढे देवयानी पवार जानवी ताटे संध्या चौगुले यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार यांनी विद्यार्थ्यांना मनोगतामध्ये शिवराय संस्कार काळाची गरज असून ज्याप्रकारे जिजामातेने शिवाजी महाराजांना लहानपणी गोष्टी सांगितल्या त्या प्रमाणे सध्याच्या महिलांनी मातांनी आपल्या मुलांना संस्काराचे धडे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले
 केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी शिवरायांची युद्धनीती तलवारबाजी गनिमी कावा संघटन चातुर्य निर्णय क्षमता विविध कौशल्य यावर त्यांनी विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकात जिजामाता ने ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना महाभारत रामायण अशा बोधपर गोष्टी सांगितल्या होत्या त्या प्रमाणे सध्याच्या माता भगिनींनी आपल्या मुलांना अशा गोष्टीचे स्मरण करून देणे अत्यंत गरजेचे आहे व काळाची गरज आहेत असे प्रतिपादन केले कारण यामध्ये दोन वर्षे विद्यार्थी संभ्रमावस्था मध्ये दिसून येत आहे त्याला धड चांगलं समजत नाही पण जर वाईट कोणत्या गोष्टीचा आहे पण समजत नाही त्या साठी हा संस्कार खरोखरच मार्गदर्शक तत्त्वे असून सध्याच्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी शिवराय संस्काराचा आधार घेऊन विचार सांगावेत असे प्रतिपादन केले अंगात ताकद असून चालणार नाही तर कशाला सुद्धा असणे गरजेचे आहे त्या प्रमाणे बुद्धीला प्रात्यक्षिकाची गरज आहे याची जोड देऊन चतुरपणे वागले पाहिजे असे सुद्धा त्यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधले.

 सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धकांना उत्तम कुंभार व इतर मान्यवरांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले कारण प्लास्टिक हटवा देश वाचवा एकच नारा प्लास्टिक बंदी अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी वापर करणार नाही अशी शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभु गाटे यांनी केले.तमेजा मुजावर यांनी रंगरंगोटी रांगोळी घालून शाळेचे वातावरण शोभिवंत केले होते मीना मंच या प्रमुख आवटी मॅडम तांबोळी मॅडम यांनी महिलांना व मुलांना सुरक्षितेचे धडे दिले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड चौगुले राजू लोंढे सदस्य उपस्थित होते सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार सार्थक पाटोळे यांनी मांनले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :