Tuesday 27 February 2018

mh9 NEWS

अस्थि विसर्जनाचा नवा पायंडा - स्वर्गीयांच्या आठवणी देतात मायेची सावली व ममतेची फळे

हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा संगमनेर मधील गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता घरासमोर फळ देणारे झाड लावून केले जाणारं आहेत.
संगमनेर तालूक्यातील पठार भागात डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसं गाव सावरगावतळ. गावाची लोकसंख्या जेमतेम चार एक हजार. गावातील तरूणांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी विवेकानंद युवा जागृती प्रतीष्ठानची स्थापना केली. या मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. यावर्षीपासून गावात अस्थिविसर्जन बंद करण्यात आलं आहे. तर फळझाडाच्या मुळात मृतव्यक्तीच्या घरासमोर या अस्थिविसर्जित केल्या जातायेत.
घरासमोर लावलेली झाडं आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना इथले गावकरी व्यक्त करतायत.

सहा महिन्यांपुर्वी वडीलांच्या निधनानंतर कारभारी गाडे यांनी घरासमोर लावलेल्या आंब्याच्या झाडाला आता बहर आला आहे.
दिड वर्षापुर्वी सुरू झालेल्या या नव्या परंपरेनंतर 51 कुटुंबांनी अशी झाडं लावली आहेत. आणि या झाडांची ते काळजीही घेतायत. यातून पर्यावरणालाही मदत होतेय हे नक्की.

एका छोट्या गावातल्या तरूणांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या या नव्या संकल्पनेचं सगळ्यांकडून कौतूक होतं आहे.

आपण सर्व जण यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच चांगला बदल घडवून आणू शकतो यासाठी वाचा आणि सर्वांना पाठवा.

साभार - प्रमोद गुळवे, काटकसर फेसबुक ग्रुप

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :