Monday 31 August 2020

mh9 NEWS

पर्यावरण समतोलासाठी वृक्ष संगोपन ही आजच्या काळाची गरज- जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे


उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे 

वक्षारोपण ही सामाजिक चळवळ बनली पाहीजे.प्रत्येक नागरिकांने या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवावा.जर हे शक्य नसेल तर किमान वृक्षसंगोपनासाठी तरी पुढे यावे असे आवाहन करत पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही आजच्या काळाची खरी गरज बनली असून जास्तीत जास्त संख्येने वृक्ष लागवड केली पाहिजे.तसेच त्यांचे संगोपन ही तितकेच महत्त्वाचे आहे.असे ते हैबतपुर ता.उदगीर येथे वृक्षलागवडी कार्यक्रम दरम्यान  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे  1000 वृक्ष रोपांची लागवड करत असताना बोलत होते.यावेळी मंचावर उपस्थित जि.प.माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके,सरपंच सुधाकर दंडिमे,पंचायत समिती सदस्य सुभाष कांबळे,भाजपचे उदगीर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत भातमोडे,तिवटघ्याळचे सरपंच गजानन नरहरे,अशोक तेलंगपूरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :